शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 19:36 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक  बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच  शिवाय पांढर्‍या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. 

ठळक मुद्देबियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकरी आक्रमक तालुक्यातील शेतकर्‍यांनी यंदा मोठय़ा  प्रमाणात कपाशीचा पेरा केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर :  तालुक्यातील शेतकरी लाल बोंडअळीमुळे पूर्ता त्रस्त झालेला  आहे. शेतीला लावलेला खर्चही हाती न मिळाल्यामुळे शेतातील हजारो  एकरवरील कपाशीच्या पिकांवर रोडावेटर फिरुन कपाशीचे पिक शेतातून हद्द पार केलेले आहे. तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक  बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच  शिवाय पांढर्‍या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी यंदा मोठय़ा  प्रमाणात कपाशीचा पेरा केला. चालु हंगामी वर्षात अत्यअल्प प्रमाणात पाऊस  पडला. मात्र, ज्या शेतकर्‍यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे, अशांनी पिकाला  पाणी देवून पिक उभे केले. कपाशीच्या एका झाडाला जवळ जवळ ३0 ते ३५  बोंड लागली. पण कापूस काही फुटत नसल्याने शेतकर्‍यामध्ये शंकेची पाल  चुकचुकली. प्रत्येक शेतकर्‍यांनी आपआपल्या शेतातील कपाशीच्या बोंडाची  पाहणी केली असता त्यामध्ये कापूस तर सोडाच सर्वत्र लालबोंड अळीच दिसुन  आली. बिटी कंपनीने कपाशीचे बोगस बियाणे देवून शेतकर्‍यांची चक्क  फसवणूक केली असल्याचे प्रत्यक्षदश्री पहावयास मिळाले. सिरसो, जांभा खु., शेलूं बोंडे आदी भागातील नागरिक शेतकर्‍यांनी पैशाची  जुळवाजुळव करुन कपाशीचे पिक उभे केले. पूर्वीच उडीद, मूग, सोयाबीन  िपकांचे झालेल्या अत्यल्प उत्पादनामुळे नुकसानीमुळे खर्चही न निघाल्याने ह तबल झालेल्या शेतकर्‍यांवर बोंडअळीमूळे आस्मानी संकट कोसळले. राज्य  शासनाने झालेल्या नुकसानाची पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवून  देण्यासाठी शेतकर्‍यांनी जिवाचा आटापिटा केला. मात्र, त्यांना  आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. निवडणूकीपूर्वी पंतप्रधान व मुख्यमंत्री  यांनी शेतकर्‍यांना हमीभाव आणि पिकाला भाव मिळवून देण्याची हमी दिली हो ती. त्यालाही तिन वर्ष उलटली तरीही शेतकरी व आम जनतेचे ‘अच्छे दिन’  आलेच नाही. बीटी कपाशीच्या बोगस बियाण्याची चौकशी करुन शासनाने  कनपनी विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी मुर्तिजापूर तालुक्या तील शेतकर्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री पांडूरंग  फुंडकर यांच्याकडे एक निवेदन देवून केली आहे. -

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरcottonकापूस