शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोफत धान्य वाटपात मिळाली नाही डाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:03 IST

प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत जुलै ते नोव्हेबर या कालावधीत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले असले तरी, मोफत धान्य वाटपात प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हरभरा व तूर डाळीचा साठा तेव्हा उपलब्ध होणार आणि गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल ते जून तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ५ किलो तांदळासोबत प्रति शिधापत्रिका एक किलो हरभरा किंवा तूर यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यात आले होते. त्यानंतर शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील पत्रिकाधारक लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे; परंतु गहू व तांदळासोबतच प्रति शिधापत्रिका १ किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी हरभरा व तूर डाळीचा साठा राज्यातील जिल्हास्तरावर अद्याप उपलब्ध झाला नाही. त्यामुळे मोफत धान्य वाटपात राज्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी हरभरा व तूर डाळीचा साठा केव्हा उपलब्ध होणार आणि गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचा लाभ केव्हा मिळणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे मोफत धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या धान्यासोबतच प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप प्राप्त झाला नाही. साठा उपलब्ध होताच डाळीचे मोफत वितरण सुरू करण्यात येणार आहे.-बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

टॅग्स :Akolaअकोला