शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘आपले सरकार’ केंद्र बंद ठेवल्यास होणार दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:51 IST

अकोला : ग्रामीण भागातील शासनाच्या सेवा ठरावीक काळात आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र बंद ठेवल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसीएससी-एसपीव्हीने केंद्र स्थापन केल्यानंतर ६० दिवसांत केंद्र चालकाची नेमणूक करणे बंधनकारक केले आहे. ठरलेल्या मुदतीत केंद्र सुरू न झाल्यास दरदिवसाला ४५० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. नियमित काम करत नाही, सातत्याने गैरहजर राहतो, यावरही कंपनीला दंड केला जाणार आहे.

अकोला : ग्रामीण भागातील शासनाच्या सेवा ठरावीक काळात आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र बंद ठेवल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत किंवा संबंधितांनी तक्रार करावी लागणार आहे.ग्रामीण जनतेला त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच सर्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पंचायत राज संस्थांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प सुरू केला. त्यासाठी सीएससी-एसपीव्हीएस कंपन्यांसोबत करारनामा झाला. त्या करारनाम्यानुसार उपक्रम राबवताना त्रुटी, अडचणी निर्माण झाल्या. त्या दूर करतानाच संबंधित कंपन्यांना देयक अदा करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला.त्यानुसार सीएससी-एसपीव्हीने केंद्र स्थापन केल्यानंतर ६० दिवसांत केंद्र चालकाची नेमणूक करणे बंधनकारक केले आहे. ठरलेल्या मुदतीत केंद्र सुरू न झाल्यास दरदिवसाला ४५० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. केंद्रातील हार्डवेअर (संगणक, प्रिंटर, वेब कॅमेरा) दुरुस्ती किंवा ते बदलून देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. त्याबाबतची तक्रार हेल्पडेस्कवर नोंदवल्यानंतर २१ दिवसांत दुरुस्ती किंवा बदली न झाल्यास ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ते करावे, त्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाºयांना द्यावी, त्यानुसार कंपनीकडून दंडाची रक्कम देयकातून कपात केली जाणार आहे.कंपनीने नियुक्त केलेला केंद्र चालक नियमितपणे हजर राहत नाही, नियमित काम करत नाही, सातत्याने गैरहजर राहतो, यावरही कंपनीला दंड केला जाणार आहे. एका महिन्यातील या सर्व बाबींचा आढावा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कंपनीच्या देयकातून दंडात्मक रकमेची वसुली करण्याचे अधिकार शासनाने १७ मार्च रोजीच्या आदेशातून दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार