शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने उघडताच उसळली गर्दी; धोका कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविण्यात आले असून, त्यामध्ये ...

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविण्यात आले असून, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवांसाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. त्यानुसार दुकाने उघडताच रविवारी अकोला शहरातील बाजारपेठ आणि रस्त्यांवर नागरिकांची गर्दी उसळली. बाजारपेठ आणि रस्ते गजबजल्याने कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका कायमच अडल्याचे वास्तव समोर आले.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात ९ ते १५ मे या कालावधीत संपूर्ण कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामध्ये वैद्यकीय सेवा आणि औषधीची दुकाने तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ मे रोजी दिला. वाढविण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. त्यानुसार संपूर्ण कडक निर्बंधांत सहा दिवसांनंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रविवारी सकाळी उघण्यात आली. दुकाने उघडताच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अकोला शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली. किराणा, भाजीपाला फळे व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. बाजारपेठेसह शहरातील विविध भागांत रस्ते आणि प्रमुख चौक नागरिकांच्या गर्दीने गजबजली होती. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका कायमच असल्याचे वास्तव समोर आले.

‘या’ भागात झाली

होती प्रचंड गर्दी!

शहरातील जनता बाजार, गांधी रोड, टिळक मार्ग, जुना भाजी बाजार, धान्य बाजार, मुंगीलाल बाजोरिया ग्राउंडमधील भाजी बाजार आदी भागात खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

वेळ संपल्यानंतरही

गर्दी कायम!

कडक निर्बंधांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. मात्र, वेळ संपल्यानंतरही बाजारात दुकाने सुरू होती. त्यामुळे दुपारी १२.१५ वाजेपर्यंत बाजारात नागरिकांची गर्दी कायम होती.

गर्दीतून वाट काढणे

झाले होते कठीण!

सहा दिवसांनंतर दुकाने उघडल्याने रविवारी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठ परिसरात वाहनांची कोंडी आणि गर्दीतून वाट काढणे कठीण झाले होते.

रस्त्यांच्या कडेला

कचऱ्याचे साम्राज्य!

कडक निर्बंधांच्या कालावधीत सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने भाजीपाला, फळे आदी वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली; परंतु वस्तूंच्या विक्रीनंतर कागद, प्लास्टिक पिशव्या रस्त्यावरच टाकण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठ परिसरातील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत होते.