शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुकाने उघडताच उसळली गर्दी; धोका कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविण्यात आले असून, त्यामध्ये ...

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविण्यात आले असून, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवांसाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. त्यानुसार दुकाने उघडताच रविवारी अकोला शहरातील बाजारपेठ आणि रस्त्यांवर नागरिकांची गर्दी उसळली. बाजारपेठ आणि रस्ते गजबजल्याने कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका कायमच अडल्याचे वास्तव समोर आले.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात ९ ते १५ मे या कालावधीत संपूर्ण कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामध्ये वैद्यकीय सेवा आणि औषधीची दुकाने तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ मे रोजी दिला. वाढविण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. त्यानुसार संपूर्ण कडक निर्बंधांत सहा दिवसांनंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रविवारी सकाळी उघण्यात आली. दुकाने उघडताच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अकोला शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली. किराणा, भाजीपाला फळे व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. बाजारपेठेसह शहरातील विविध भागांत रस्ते आणि प्रमुख चौक नागरिकांच्या गर्दीने गजबजली होती. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका कायमच असल्याचे वास्तव समोर आले.

‘या’ भागात झाली

होती प्रचंड गर्दी!

शहरातील जनता बाजार, गांधी रोड, टिळक मार्ग, जुना भाजी बाजार, धान्य बाजार, मुंगीलाल बाजोरिया ग्राउंडमधील भाजी बाजार आदी भागात खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

वेळ संपल्यानंतरही

गर्दी कायम!

कडक निर्बंधांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. मात्र, वेळ संपल्यानंतरही बाजारात दुकाने सुरू होती. त्यामुळे दुपारी १२.१५ वाजेपर्यंत बाजारात नागरिकांची गर्दी कायम होती.

गर्दीतून वाट काढणे

झाले होते कठीण!

सहा दिवसांनंतर दुकाने उघडल्याने रविवारी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठ परिसरात वाहनांची कोंडी आणि गर्दीतून वाट काढणे कठीण झाले होते.

रस्त्यांच्या कडेला

कचऱ्याचे साम्राज्य!

कडक निर्बंधांच्या कालावधीत सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने भाजीपाला, फळे आदी वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली; परंतु वस्तूंच्या विक्रीनंतर कागद, प्लास्टिक पिशव्या रस्त्यावरच टाकण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठ परिसरातील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत होते.