शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

६ हजार २७४ हेक्टरवरील पिके मातीमोल, अवकाळीचा तडाखा

By रवी दामोदर | Updated: April 11, 2023 14:55 IST

घास हिरावला, शेतकरी हतबल

रवी दामोदर, अकोला: जिल्ह्यात तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात तीन दिवसांत ६ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबूज, पपई, भाजीपाला व लिंबू या पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील काही भागांत सलग तीन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे परिश्रमाने फुलविलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शुक्रवार दुपारपासून जिल्हाभरातील आसमंतात ढगांचा मंडप तयार होऊन ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ८५९.०७ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पुन्हा रविवारी तिसऱ्या दिवशीही रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तब्बल ४१५ हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे. रविवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने सर्वांची दाणादाण उडविली होती. या वादळी वाऱ्यामुळे अंशत: ७ घरांचे नुकसान झाले आहे.

कृषिमंत्र्यांकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पातूर व बाळापूर तालुक्यातील बेलुरा खुर्द व वाडेगाव येथे पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषिमंत्री सत्तार यांनी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी, तहसीलदार सय्यद ऐसामुद्दीन, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक आदी उपस्थित होते.

प्राथमिक अहवालानुसार असे झाले नुकसान

तालुका                         शेती नुकसान क्षेत्र (हे.)

  • पातूर                           ३११५.९७
  • बाळापूर                      १७०६
  • बार्शी टाकळी              ३००
  • अकोला                       १०८८
  • मूर्तिजापूर                    ६४.१०

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला