शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

पारद परिसरात १०० एकरावरील पिके पाण्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतशिवारातील तब्बल १०० एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी सरपंच विनोद मानकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील पारद परिसरात सांगवा मेळ, भटोरी आणि पारद येथील शेतकऱ्यांना बसला आहे. खेकडी नाल्याला आलेल्या पुरामुळे तब्बल शंभर एकर क्षेत्रावर पाणीच पाणी साचले आहे. याशिवाय, पूर्णा नदीकाठजवळील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे परिसरात महसूल विभागाने सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनामे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. (फोटो)

-------------------------------

पंचनामे करून मदत द्या; अन्यथा आंदोलन

मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागात सर्व्हे करण्याचा आदेश महसूल प्रशासनाने त्वरित द्यावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी पारद येथील सरपंच विनोद मानकर, सामाजिक कार्यकर्ते नाजूकराव खंडारे, ग्रा.पं. सदस्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत दुर्लक्ष केल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

-----------------------

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकात पाणी साचल्याने पिके पिवळी पडून उत्पादन घटणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. काही शेतकऱ्यांची पिकांसह शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.