शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पारद परिसरात १०० एकरावरील पिके पाण्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतशिवारातील तब्बल १०० एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी सरपंच विनोद मानकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील पारद परिसरात सांगवा मेळ, भटोरी आणि पारद येथील शेतकऱ्यांना बसला आहे. खेकडी नाल्याला आलेल्या पुरामुळे तब्बल शंभर एकर क्षेत्रावर पाणीच पाणी साचले आहे. याशिवाय, पूर्णा नदीकाठजवळील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे परिसरात महसूल विभागाने सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनामे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. (फोटो)

-------------------------------

पंचनामे करून मदत द्या; अन्यथा आंदोलन

मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागात सर्व्हे करण्याचा आदेश महसूल प्रशासनाने त्वरित द्यावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी पारद येथील सरपंच विनोद मानकर, सामाजिक कार्यकर्ते नाजूकराव खंडारे, ग्रा.पं. सदस्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत दुर्लक्ष केल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

-----------------------

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकात पाणी साचल्याने पिके पिवळी पडून उत्पादन घटणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. काही शेतकऱ्यांची पिकांसह शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.