शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अकोला जिल्ह्यात ५० हजार शेतकऱ्यांना ४५६ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 10:46 IST

Crop loan News : जिल्ह्यातील ९२ हजार २१५ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, त्यापैकी १८ मेपर्यंत जिल्ह्यात ५० हजार २८५ शेतकऱ्यांना ४५६ कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असताना उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यातील ९२ हजार २१५ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने गत १ एप्रिलपासून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत १८ मेपर्यंत जिल्ह्यात ५० हजार २८५ शेतकऱ्यांना ४५६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असून, खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असताना, जिल्ह्यातील ९२ हजार २१५ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे. १८ मेपर्यंत जिल्ह्यातील ५० हजार २८५ शेतकऱ्यांना ४५६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहे.

-आलोक तारेणिया

व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीAkolaअकोला