शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

शेतकऱ्यांच्या बारा महिन्यांच्या खेपीवर दरवर्षी संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती: शेतकरी मेटाकुटीस प्रशांत विखे तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या ...

खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती:

शेतकरी मेटाकुटीस

प्रशांत विखे

तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या काही अनेक वर्षांपासून खरीप हंगामात अज्ञात रोगाचे आक्रमण, व्हायरसचा प्रकोप, बोन्ड अळीचे थैमान घालत असून, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांना नेमक्या मुख्य पिकांपैकी आता कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जिल्हा असलेल्या कृषी विद्यापीठाने नवीन तंत्रज्ञान विकसित करून खरीप हंगामात हमी असलेल्या पिकांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगाम आहेत. त्यापैकी खरीप हंगाम ही शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप समजली जाते. खरीप हंगामातील मुख्य पिकांमधून येणाऱ्या उत्पादनावर शेतकरी स्वप्ने पूर्ण होण्याची वाट बघतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामातील मुख्य पीक कपाशी शेतकऱ्यांना दगा देत आहे. कपाशीवर बोन्ड अळी, बोंड सळीचे आक्रमण होत असून, पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. सोयाबीन सुद्धा मुख्य पीक समजले जाते; मात्र या पिकावर खोडकिळा व चक्रीभुंगा दरवर्षी येऊन आक्रमण करीत असून, उत्पादनात घट होत आहे. एकरी दहा क्विंटल होणारे पीक दोन ते तीन क्विंटलवर येऊन ठेपले आहे.

---------------------

उडीद, मुगाच्या उत्पादनात प्रचंड घट

शेतकरी नगदी पीक म्हणून मूग, उडीद पिके घेतात. या पिकांवर बेडका रोग, व्हायरसचे आक्रमण होत आहे. तूर या पिकावर मररोग, अळींचे आक्रमण बघता, याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी लढा देत आहे. निसर्गाची साथ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच विविध रोगांचे आक्रमणही वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट निर्माण होत आहे. कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना हमी देणारे वाण विकसित करण्याची मागणी होत आहे.

------------------

कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी मी शेतातील पिकांवर फवारणी किंवा पीक लागवड करीत आहे, परंतु तरीही पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होत नसल्याने लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नसल्याचा हा परिणाम आहे.

- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा.

-------------------------

कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा