शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या बारा महिन्यांच्या खेपीवर दरवर्षी संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती: शेतकरी मेटाकुटीस प्रशांत विखे तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या ...

खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती:

शेतकरी मेटाकुटीस

प्रशांत विखे

तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या काही अनेक वर्षांपासून खरीप हंगामात अज्ञात रोगाचे आक्रमण, व्हायरसचा प्रकोप, बोन्ड अळीचे थैमान घालत असून, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांना नेमक्या मुख्य पिकांपैकी आता कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जिल्हा असलेल्या कृषी विद्यापीठाने नवीन तंत्रज्ञान विकसित करून खरीप हंगामात हमी असलेल्या पिकांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगाम आहेत. त्यापैकी खरीप हंगाम ही शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप समजली जाते. खरीप हंगामातील मुख्य पिकांमधून येणाऱ्या उत्पादनावर शेतकरी स्वप्ने पूर्ण होण्याची वाट बघतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामातील मुख्य पीक कपाशी शेतकऱ्यांना दगा देत आहे. कपाशीवर बोन्ड अळी, बोंड सळीचे आक्रमण होत असून, पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. सोयाबीन सुद्धा मुख्य पीक समजले जाते; मात्र या पिकावर खोडकिळा व चक्रीभुंगा दरवर्षी येऊन आक्रमण करीत असून, उत्पादनात घट होत आहे. एकरी दहा क्विंटल होणारे पीक दोन ते तीन क्विंटलवर येऊन ठेपले आहे.

---------------------

उडीद, मुगाच्या उत्पादनात प्रचंड घट

शेतकरी नगदी पीक म्हणून मूग, उडीद पिके घेतात. या पिकांवर बेडका रोग, व्हायरसचे आक्रमण होत आहे. तूर या पिकावर मररोग, अळींचे आक्रमण बघता, याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी लढा देत आहे. निसर्गाची साथ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच विविध रोगांचे आक्रमणही वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट निर्माण होत आहे. कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना हमी देणारे वाण विकसित करण्याची मागणी होत आहे.

------------------

कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी मी शेतातील पिकांवर फवारणी किंवा पीक लागवड करीत आहे, परंतु तरीही पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होत नसल्याने लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नसल्याचा हा परिणाम आहे.

- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा.

-------------------------

कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा