शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

शेतकऱ्यांच्या बारा महिन्यांच्या खेपीवर दरवर्षी संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती: शेतकरी मेटाकुटीस प्रशांत विखे तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या ...

खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती:

शेतकरी मेटाकुटीस

प्रशांत विखे

तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या काही अनेक वर्षांपासून खरीप हंगामात अज्ञात रोगाचे आक्रमण, व्हायरसचा प्रकोप, बोन्ड अळीचे थैमान घालत असून, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांना नेमक्या मुख्य पिकांपैकी आता कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जिल्हा असलेल्या कृषी विद्यापीठाने नवीन तंत्रज्ञान विकसित करून खरीप हंगामात हमी असलेल्या पिकांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगाम आहेत. त्यापैकी खरीप हंगाम ही शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप समजली जाते. खरीप हंगामातील मुख्य पिकांमधून येणाऱ्या उत्पादनावर शेतकरी स्वप्ने पूर्ण होण्याची वाट बघतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामातील मुख्य पीक कपाशी शेतकऱ्यांना दगा देत आहे. कपाशीवर बोन्ड अळी, बोंड सळीचे आक्रमण होत असून, पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. सोयाबीन सुद्धा मुख्य पीक समजले जाते; मात्र या पिकावर खोडकिळा व चक्रीभुंगा दरवर्षी येऊन आक्रमण करीत असून, उत्पादनात घट होत आहे. एकरी दहा क्विंटल होणारे पीक दोन ते तीन क्विंटलवर येऊन ठेपले आहे.

---------------------

उडीद, मुगाच्या उत्पादनात प्रचंड घट

शेतकरी नगदी पीक म्हणून मूग, उडीद पिके घेतात. या पिकांवर बेडका रोग, व्हायरसचे आक्रमण होत आहे. तूर या पिकावर मररोग, अळींचे आक्रमण बघता, याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी लढा देत आहे. निसर्गाची साथ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच विविध रोगांचे आक्रमणही वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट निर्माण होत आहे. कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना हमी देणारे वाण विकसित करण्याची मागणी होत आहे.

------------------

कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी मी शेतातील पिकांवर फवारणी किंवा पीक लागवड करीत आहे, परंतु तरीही पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होत नसल्याने लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नसल्याचा हा परिणाम आहे.

- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा.

-------------------------

कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा