शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 10, 2017 02:15 IST

वरूर जऊळका परिसरात ९० टक्के पेरण्या आटोपल्या: शेतमजुरांवर बेरोजगारीचे संकट

वरूर जऊळका: अकोट तालुक्यातील वरूर जऊळका, लोतखेड, खापरवाडी बु. व खुर्द, सावरगाव, विटाळी आदी गावातील शेतकऱ्यांच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून, येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. दुसरीकडे शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या भागामध्ये पाऊस आला तो नसल्यागतच झालेला आहे; परंतु वेळ होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कमी पावसावरच पेरण्या केलेल्या आहेत. हवामान खात्याने व भेंडवळ मांडणीमध्ये १०० टक्के पाऊस सांगितल्याने यावर्षी या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. तसेच या भाकितामुळे शेतीच्या लागवडीचे भाव वाढलेले होते. यावर शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा होऊन लागवडीचे भाव वाढलेले असून पेरण्या केलेल्या आहेत. पेरण्या झालेल्या शेतामधील बीजे अंकुरलेली आहेत. अंकुरलेल्या बीजांना शेतकरी डवरणी देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावर पिकेसुद्धा चांगली झाली; परंतु यावर्षी मृग नक्षत्राला एक महिन्याचा अवधी होत आला असून, पावसाने दांडी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी पेरलेली आहे. शेतकऱ्यांनी महाग बियाणे खरेदी करून मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पिके चांगली येणार, या आशेवर पेरण्या आटोपून घेतल्या; परंतु पावसाने थांबा दिल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लगणार की काय, या विवंचनेत शेतकरी पडला आहे. मजुरांना मजुरी नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. पाऊस येण्यासाठी शेतकरी वरुणराजाला प्रसन्न होण्यासाठी विनवणी करीत आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेतयंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच चांगला पाउस पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र गेल्या २० ते २२ दिवसांपासून आलेगाव परिसरात दीर्घ दांडी मारल्यामुळे हलक्या रानातील काही पिके पाण्याअभावी संकटात आली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.मागील तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात आहे.यावर्षी ९ जून रोजी परिसरात दमदार पाऊस पडल्याने १३ जूनपासून काही शेतकऱ्यांनी कपाशी, उडीद व सोयाबीन पेरणीस सुरुवात केली. त्यांच्या शेतात बीज अंकुरले होते. नंतर १० ते १२ दिवस कडक उन्ह तापत गेल्याने राहिलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला ब्रेक दिला. २६ जून रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांनी आता पाऊस येणारच या आशेवर उरलेली पेरणी केली; मात्र सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे पेरण्या उलटतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असले की पिके तग धरू शकत नाहीत. त्यामुळे उत्पादनाची टक्केवारी घटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हातोडी परिसरात पावसाची प्रतीक्षापरिसरात पावसाने दगा दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, शेतकरी चिंतातुर झाला आहे. यावर्षी पावसाची चांगली सुरुवात झाली व शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.म्हातोडी परिसरात म्हातोडी, कासली, दोनवाडा, लाखोंडा बु., लाखोंडा खु., घुसरवाडी येथील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.