शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 10, 2017 02:15 IST

वरूर जऊळका परिसरात ९० टक्के पेरण्या आटोपल्या: शेतमजुरांवर बेरोजगारीचे संकट

वरूर जऊळका: अकोट तालुक्यातील वरूर जऊळका, लोतखेड, खापरवाडी बु. व खुर्द, सावरगाव, विटाळी आदी गावातील शेतकऱ्यांच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून, येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. दुसरीकडे शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या भागामध्ये पाऊस आला तो नसल्यागतच झालेला आहे; परंतु वेळ होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कमी पावसावरच पेरण्या केलेल्या आहेत. हवामान खात्याने व भेंडवळ मांडणीमध्ये १०० टक्के पाऊस सांगितल्याने यावर्षी या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. तसेच या भाकितामुळे शेतीच्या लागवडीचे भाव वाढलेले होते. यावर शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा होऊन लागवडीचे भाव वाढलेले असून पेरण्या केलेल्या आहेत. पेरण्या झालेल्या शेतामधील बीजे अंकुरलेली आहेत. अंकुरलेल्या बीजांना शेतकरी डवरणी देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावर पिकेसुद्धा चांगली झाली; परंतु यावर्षी मृग नक्षत्राला एक महिन्याचा अवधी होत आला असून, पावसाने दांडी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी पेरलेली आहे. शेतकऱ्यांनी महाग बियाणे खरेदी करून मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पिके चांगली येणार, या आशेवर पेरण्या आटोपून घेतल्या; परंतु पावसाने थांबा दिल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लगणार की काय, या विवंचनेत शेतकरी पडला आहे. मजुरांना मजुरी नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. पाऊस येण्यासाठी शेतकरी वरुणराजाला प्रसन्न होण्यासाठी विनवणी करीत आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेतयंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच चांगला पाउस पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र गेल्या २० ते २२ दिवसांपासून आलेगाव परिसरात दीर्घ दांडी मारल्यामुळे हलक्या रानातील काही पिके पाण्याअभावी संकटात आली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.मागील तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात आहे.यावर्षी ९ जून रोजी परिसरात दमदार पाऊस पडल्याने १३ जूनपासून काही शेतकऱ्यांनी कपाशी, उडीद व सोयाबीन पेरणीस सुरुवात केली. त्यांच्या शेतात बीज अंकुरले होते. नंतर १० ते १२ दिवस कडक उन्ह तापत गेल्याने राहिलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला ब्रेक दिला. २६ जून रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांनी आता पाऊस येणारच या आशेवर उरलेली पेरणी केली; मात्र सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे पेरण्या उलटतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असले की पिके तग धरू शकत नाहीत. त्यामुळे उत्पादनाची टक्केवारी घटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हातोडी परिसरात पावसाची प्रतीक्षापरिसरात पावसाने दगा दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, शेतकरी चिंतातुर झाला आहे. यावर्षी पावसाची चांगली सुरुवात झाली व शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.म्हातोडी परिसरात म्हातोडी, कासली, दोनवाडा, लाखोंडा बु., लाखोंडा खु., घुसरवाडी येथील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.