शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम कर्जखात्यात जमा केल्यास फौजदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 14:53 IST

अकोला : पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संंबंधित बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.

ठळक मुद्दे शासनाकडून आणि विमा कंपनीकडून प्राप्त होणाºया अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत.त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला आहे.

- संतोष येलकर

अकोला : पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संंबंधित बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून आणि विमा कंपनीकडून प्राप्त होणाºया अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित शेतकºयांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त आदेश आहेत; परंतु जिल्ह्यातील काही बँकांमध्ये शासनाकडून व विमा कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शासनाकडून आणि विमा कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आल्यास, त्यासंदर्भात संबंधित बँक अधिकाºयांना जबाबदार ठरवून, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला आहे.

शासन निर्देशाकडे दुर्लक्ष; ही शोभणारी बाब नाही!शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त निर्देश असताना, शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रारी गंभीर स्वरुपाच्या असून, अशा कार्यप्रणालीमुळे शासन निर्देशाच्या अंमलबजावणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा वर्तणुकीमुळे शेतकरी वर्गात शासनाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ही बाब शोभणारी नाही, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

शासन निर्देशानुसार पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकºयांच्या खात्यात जमा केलेली रक्कम कपात करून शेतकºयांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संबंधित बँक अधिकाºयांना जबाबदार ठरवून, फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांना मी आदेश दिला आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, अकोला 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी