शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पीक विमा प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास फौजदारी कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 10:30 IST

Agriculture Minister Dadaji Bhuse warn insurance companies : फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विमा कंपनीसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना रविवारी येथे दिला.

अकोला: अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा घेत, पीक विमा योजनेच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विमा कंपनीसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना रविवारी येथे दिला. (Agriculture Minister Dadaji Bhuse warn insurance companies)

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, जिल्हाधिकारी निमा अरोरा, डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.विलास भाले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेती आणि पीक नुकसानीसह प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती कृषी मंत्र्यांनी यावेळी घेतली. पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीची तक्रार व अर्ज दाखल करण्यासाठी विमा कंपनीचे संकेतस्थळ हँग किंवा बंद असल्यास संबंधित विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच पीक विमा प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास विमा कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असून, या कामात हलगर्जी करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीचे तक्रारी अर्ज कृषी विभाग, महसूल विभागासह संबंधित बँकांनी स्वीकारुन त्यांनी ते अर्ज विमा कंपनीकडे सादर करण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज!

जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ९६ टक्के पेरण्या झाल्या असून, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ५४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी बैठकीत दिली.

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमा