शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

रब्बी हंगामात कर्ज वितरणाचा हात अखडता; ३१.७१ टक्केच वाटप

By रवी दामोदर | Updated: December 20, 2023 16:57 IST

शेतकऱ्यांची बॅंकेत चकरा वाढल्या 

अकोला : कर्ज वितरणाला दीड महिना उलटून गेल्यावरही रब्बी हंगामातही बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात कायम ठेवल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना केवळ ५५.४९ कोटी रुपये म्हणजे सरासरी ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. रब्बी हंगामात कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बॅंकेच्या दारात चकरा वाढल्या आहेत. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खरीप हंगामात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण भासत असल्याने शेतकरी बॅंकेत चकरा मारत आहेत. परंतु बँकांकडून कर्ज वितरण करता हात आखडताच असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात कर्ज वितरणाचे १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना दि. १८ डिसेंबरपर्यंत केवळ ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत

यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर शेतात पीक डोलत असताना अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तसेच जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन फुलधारणेच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात बाजार समितीत दर नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नसल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असून, कर्ज वितरण प्रक्रिया वेगाने राबविण्याची मागणी होत आहे.

४ हजार ५७९ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटपजिल्ह्यात रब्बी हंगामात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. रब्बी हंगामात ९ हजार शेतकऱ्यांना १७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट आहे, त्यापैकी ४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ५५.४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. खरीप हंगामाच कर्ज वितरण चांगले झाले असून, तब्बल सरासरीच्या ९२.२५ टक्के कर्ज वाटप झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला