शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

रब्बी हंगामात कर्ज वितरणाचा हात अखडता; ३१.७१ टक्केच वाटप

By रवी दामोदर | Updated: December 20, 2023 16:57 IST

शेतकऱ्यांची बॅंकेत चकरा वाढल्या 

अकोला : कर्ज वितरणाला दीड महिना उलटून गेल्यावरही रब्बी हंगामातही बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात कायम ठेवल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना केवळ ५५.४९ कोटी रुपये म्हणजे सरासरी ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. रब्बी हंगामात कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बॅंकेच्या दारात चकरा वाढल्या आहेत. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खरीप हंगामात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण भासत असल्याने शेतकरी बॅंकेत चकरा मारत आहेत. परंतु बँकांकडून कर्ज वितरण करता हात आखडताच असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात कर्ज वितरणाचे १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना दि. १८ डिसेंबरपर्यंत केवळ ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत

यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर शेतात पीक डोलत असताना अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तसेच जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन फुलधारणेच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात बाजार समितीत दर नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नसल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असून, कर्ज वितरण प्रक्रिया वेगाने राबविण्याची मागणी होत आहे.

४ हजार ५७९ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटपजिल्ह्यात रब्बी हंगामात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. रब्बी हंगामात ९ हजार शेतकऱ्यांना १७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट आहे, त्यापैकी ४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ५५.४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. खरीप हंगामाच कर्ज वितरण चांगले झाले असून, तब्बल सरासरीच्या ९२.२५ टक्के कर्ज वाटप झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला