शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात कर्ज वितरणाचा हात अखडता; ३१.७१ टक्केच वाटप

By रवी दामोदर | Updated: December 20, 2023 16:57 IST

शेतकऱ्यांची बॅंकेत चकरा वाढल्या 

अकोला : कर्ज वितरणाला दीड महिना उलटून गेल्यावरही रब्बी हंगामातही बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात कायम ठेवल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना केवळ ५५.४९ कोटी रुपये म्हणजे सरासरी ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. रब्बी हंगामात कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बॅंकेच्या दारात चकरा वाढल्या आहेत. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खरीप हंगामात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण भासत असल्याने शेतकरी बॅंकेत चकरा मारत आहेत. परंतु बँकांकडून कर्ज वितरण करता हात आखडताच असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात कर्ज वितरणाचे १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना दि. १८ डिसेंबरपर्यंत केवळ ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत

यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर शेतात पीक डोलत असताना अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तसेच जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन फुलधारणेच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात बाजार समितीत दर नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नसल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असून, कर्ज वितरण प्रक्रिया वेगाने राबविण्याची मागणी होत आहे.

४ हजार ५७९ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटपजिल्ह्यात रब्बी हंगामात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. रब्बी हंगामात ९ हजार शेतकऱ्यांना १७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट आहे, त्यापैकी ४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ५५.४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. खरीप हंगामाच कर्ज वितरण चांगले झाले असून, तब्बल सरासरीच्या ९२.२५ टक्के कर्ज वाटप झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला