शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

गायी वाटपात झाला घोटाळा !

By admin | Updated: July 10, 2015 01:37 IST

चौकशी अंतिम टप्प्यात; लवकरच येणार अहवाल बाहेर.

राजरत्न सिरसाट/अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत गायींचे वाटप करण्यात आले. या वाटपात अकोला जिल्हय़ात घोटाळा झाला आहे. या घोटाळ्य़ाची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यात काही नावे निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे. विदर्भ विकास पॅकेजच्या गायी वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर या घोटाळ्य़ाची चौकशी होण्यास सात वर्ष विलंब लागला. या संदर्भात लोकमतने वस्तुस्थिती मांडल्याने लाभधारक संस्थांचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने दिले होते. त्यानुसार दीड महिन्यापासून या गायी वाटप घोटाळाप्रकरणी चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन केंद्र शासनाने पंतप्रधान व राज्य शासनाने विशेष मुख्यमंत्री पॅकेज दिले होते. केंद्र आणि राज्य मिळून जवळपास चार हजार सातशे पन्नास कोटींचे हे पॅकेज होते. अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसह या पॅकेज अंतर्गत कृषिविकासाच्या योजना, शेतकर्‍यांना जोडधंद्यांबाबत विविध योजना राबविण्यात आल्या. विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी एक हजार गायींचे पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले होते; पण अनेक ठिकाणी त्यांचे वाटप कागदोपत्रीच झाले. अकोला जिल्हय़ातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना एक हजार गायींचे वाटप करण्यात आले आहे; परंतु यातील अनेक संस्थांना गायी खरेदी केल्याचे कागदोपत्री भासवून या पॅकेजच्या अनुदानाच्या रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारी झाल्या. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व सहायक निबंधक सहकारी संस्था (पदूम), अकोला यांनी संयुक्तरीत्या चौकशी करू न शासनाला अहवाल दिला होता. या अहवालात मूर्तिजापूर तालुक्यात सहा संस्थांच्या माध्यमातून ४१ गायी खरेदी केल्या नसल्याचे चौकशीअंती आढळल्याचे नमूद केले आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या माध्यमातून २६ गायींची खरेदी झालीच नाही तर तेल्हारा तालुक्यातील एका संस्थेने नऊ गायी, तर आकोट तालुक्यातील एका संस्थेने पाच गायींची खरेदी कागदोपत्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती; पण या चौकशीनंतर हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. तथापि, लोकमतने या प्रकरणी वाचा फोडल्यानंतर विद्यमान राज्य सरकारने नव्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी पूर्ण झाली आहे.