शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

देशाला ग्रामगीतेची गरज- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 13:58 IST

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते.

अकोला : देशाला गीतेची नाही तर ग्रामगीतेचीच गरज आहे. आजच्या युवकांना ग्रामगीता समजली पाहिजे, राष्ट्रसंतांचे विचार त्यांच्या डोक्यात भिनले पाहिजे. हे महान कार्य हाती घेऊन हे साहित्य संमेलन अविरत सुरू आहे. लोकवर्गणीतून सुरू असलेले हे विचार साहित्य संमेलन अधिक कृतिशील बनवण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली.वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीद्वारा आयोजित सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते. सेवा समितीच्या या कार्याला बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या. या सेवा मंडळाच्या कार्याची स्तुती करीत राष्ट्रसंतांचे विचार अधिक व्यापक करण्यासाठी या संमेलनाला अधिक व्यापक करण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या विचारावरच आपण कार्य करीत असल्याचे ते म्हणाले. आपण मंत्री नसून, आपला सेवक असल्याचे उद्गार काढताच सभामंडप टाळ्यांच्या गजरात कडाडून गेले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, संदीपपाल महाराज, संमेलनाध्यक्ष रामदास चोरडे गुरुजी, मनपा स्थायी समिती सभापती विनोद मापारी, माधव राऊत, सावळेगुरुजी, सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, प्रहारचे मनोज पाटील, तुषार फुंडकर, कपिल ढोके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन मोहोकार यांनी केले. आभार गोपाल गाडगे यांनी मानले. 

 

टॅग्स :rashtrasant tukdoji maharaj vichar sahitya samelanराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनBacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोला