शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

मोजणी, भूसंपादन प्रक्रियेस ३० जूनपासून प्रारंभ होणार!

By admin | Updated: June 29, 2017 00:55 IST

नांदेड-अकोला राष्ट्रीय महामार्ग : पातूर तालुक्यातील नऊ गावांतून जाणार!

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : नांदेड ते अकोला मार्गे हिंगोली, वाशिम या २०० कि.मी. लांबीच्या १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पातूर तालुक्यातील नऊ गावांतील जमीन मोजणी तथा भूसंपादन प्रक्रिया ३ ए अधिसूचनेनुसार ३० जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.त्यासाठी पातूर तालुक्यातील शिर्ला, नांदखेड, जिराईत, पातूर, बागायत पातूर, अथराई पातूर, चिंचखेड, बोडखा, माळराजुरा, सावरखेड या गावांमधील ८१.५४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. हा महामार्ग पातूर तालुक्यातून १९.९०० कि.मी. लांबीचा जाणार आहे. ३ ए अधिसूचनेनुसार, उपरोक्त नऊ गावांतील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामासाठी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख पातूर यांच्याकडे भूसंपादन अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी ३४ लाख ९९ हजार रुपये रकमेचा भरणा केला आहे. सडक परिवहन व महामार्ग मंत्रालयाची (भारत सरकार) ३ ए २ डिसेंबर २०१६ ची अधिसूचना राज्य सरकारच्या संमतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती यांच्याकडून उपरोल्लेखित गावनिहाय कृषक, अकृषक जमिनीचे संपादन करण्याकरिता गट क्रमांक तथा संपादन करावयाच्या क्षेत्रासह प्रस्ताव प्राप्त झाल्यामुळे गावपातळीवरील रेकॉर्डवरून तपासणी ३ ए चा मसुदा तयार करण्यात आला होता, तो यापूर्वीच मंजूर झाला आहे. या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग सल्लागार म्हणून मारे टेक्नोक्रॉप्ट प्रा. लि. या कंपनीची भारत सरकारने निवड केली असून, सदर कंपनीने सर्वेक्षण तथा आरेखण आराखडा तयार केला आहे.सदर २०० कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया हिंगोली व पातूर तालुका वगळता पूर्ण झाली आहे. ५५० हेक्टर जमीन सदर महामार्गासाठी संपादित झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, एकूण ६४० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. ८० टक्के संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निविदा सूचना काढण्यात येईल. सध्या डी.पी.आर. पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. या महामार्गात येणाऱ्या रेल्वे ब्रिजच्या उभारणीसह २०० कि.मी. लांबीच्या महामार्गासाठी २२०० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. अकोला ते वाशिम जिल्ह्यादरम्यान इंग्रजांच्या काळात लावण्यात आलेली कोणतीही झाडे न तोडता झाडांना मध्यभागी घेऊन महामार्ग दोन्ही बाजूंनी बांधला जाईल. या महामार्गाच्या भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया ३० डिसेंबर २०१७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल. निविदा सूचना आणि कार्यारंभ आदेश मार्च २०१८ पूर्वी निर्गमित करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन आहे.