शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

स्वाभिमानीची ‘विदर्भ’ त्यागावर परिषदेची वारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:35 IST

स्वाभिमानीला मिळालेली विधान परिषदेची एक जागा विदर्भातील उमेदवारांनी केलेल्या त्यागाच्या भरवशावर असल्याची चर्चा आता स्वाभिमानीत रंगत आहे.

- राजेश शेगोकार 

 अकोला : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण केली होती. या आघाडीच्या जागा वाटपात चार जागांवर अडून बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केवळ एका जागेवर समाधान मानत विदर्भातील मतदारसंघाचा त्याग केला होता. आघाडीसाठी मतदारसंघ सोडण्याच्या मोबदल्यात विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल, अशी तडजोड तेव्हा स्वीकारली होती, असे खुद्द राजू शेट्टी यांनीच जाहीर केल्यामुळे स्वाभिमानीला मिळालेली विधान परिषदेची एक जागा विदर्भातील उमेदवारांनी केलेल्या त्यागाच्या भरवशावर असल्याची चर्चा आता स्वाभिमानीत रंगत आहे.राज्याच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सध्या राजकारण तापले आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस या पक्षांमध्ये प्रत्येक चार या जागांवरून राजी-नाराजीचे नाट्य असतानाच राष्टÑवादीने आपल्या कोट्यातील एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे निश्चित केले आहे. या जागेवर स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचीच वर्णी लागणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाल्यानंतर स्वाभिमानी संघटनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. जिवाभावाच्या पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांच्या संभाव्य आमदारकीबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे व्यथित झालेल्या शेट्टी यांनी ही जागा मिळविण्यामागील अनेक कारणे जाहीरपणे दिली आहेत. त्यामध्ये एक कारण लोकसभा निवडणुकीत केलेल्या तडजोडीचेही आहे.लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीकडे सहा जागा मागितल्या होत्या; मात्र त्यांचा आग्रह हा हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबतच होता. राजू शेट्टींसाठी हातकणंगले या मतदारसंघासोबतच विदर्भातील वर्धा या मतदारसंघात माजी मंत्री सुबोध मोहिते तर बुलडाणा या मतदारसंघावर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठीच दावा होता. हे दोन्ही मतदारसंघ आघाडीकडे गेल्यामुळे स्वाभिमानीची कोंडी झाली. जागा वाटपाच्या बोलणीत अंतिम टप्यात हातकणंगले व बुलडाणा या दोन मतदारसंघांवरच चर्चा थांबली होती. त्यावेळी शरद पवार यांनीच एक जागा सोडण्याचा या मोबदल्यात विधान परिषदेची एक जागा देण्याचा शब्द दिला होता. हे खुद्द शेट्टी यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिषदेची एक जागा मिळण्यामागे विदर्भातील मतदारसंघाचा त्याग असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शेट्टी यांच्या विधान परिषद उमेदवारीबाबत विदर्भातून कोणतीही नाराजी जाहीरपणे नसली तरी स्वाभिमानीच्या अंतर्गत वर्तुळात कुजबुज सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणAkolaअकोला