शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

कासोधा परिषद; आंदोलनात जिंकली; चर्चेत हरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 18:30 IST

आंदोलनाची भूमिका तयार करण्यात जिंकलेली कसोधा परिषद प्रशासनासोबत चर्चा करताना हरली व जुन्याच वळणावर येऊन थांबल्याचे चित्र आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या गेल्या वर्षी झालेल्या कापूस, सोयाबीन, धान उत्पादन शेतकऱ्याची ‘कासोधा’ परिषद झाली. यशवंत सिन्हा सारखे देशव्यापी व थेट पंतप्रधान मोदींना भिडणारे नेतृत्व या आंदोलनाला मिळाल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरले. अकोल्यात कधी नव्हे तर भाजपा वगळता सर्वच पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा देत सहभाग घेतला. सरकारवर दबाव वाढला व थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले व आंदोलनाची सांगता झाली. मात्र वर्षभर या मागण्यांकडे सरकारने ढुंकनही पाहिले नाही त्यामुळे शेतकरी जागर मंचने दूसºया ‘कासोधा’ परिषदेची हाक देऊन वातावरण निर्मिती केली. यावेळी यशवंत सिन्हांच्या जोडीला शत्रुघ्न सिन्हा व आपच्या नेत्यांची भर पडली मात्र जुन्याच मागण्यांच्या पुर्ततेसाठी जुनाचा फंडा वापरण्याचा प्रयत्न झाला अन् अखेर पुन्हा आश्वासनांची भेेंडोळी हातात घेऊन परिषदेच्या आंदोलनाची सांगता झाली. कासोधा परिषदेच्या निमित्ताने शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या प्रत्यक्षात मात्र आंदोलनाची भूमिका तयार करण्यात जिंकलेली कसोधा परिषद प्रशासनासोबत चर्चा करताना हरली व जुन्याच वळणावर येऊन थांबल्याचे चित्र आहे.यशंवत सिन्हा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या गेल्यावर्षी तीन दिवस झालेले हे आंदोलन यावर्षी अवघ्या तीन तासात आटोपले. सिन्हांसह शेकडो आंदोलक पोलिस कवायत मैदानात ठाण मांडून बसले. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता,यावेळी प्रशासनानेही आधीच तयारी केली होती. तगडा बंदोबस्त अन् गावागावातील कार्यकर्त्यांना नोटीस बजावून आधीच धमकाविण्यात आले होते मात्र तरीही परिषदेवर फारसा फरक पडला नाही. दूसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या परिषदेसाठी जागर मंचला गावागावात जवळपास दोनशे बैठका पुर्वतयारीसाठी घ्याव्या लागल्या होत्या यावेळी मात्र एवढया मोठया प्रमाणात बैठकांची गरज भासली नाही कारण शेतकºयांना ‘कासोधा’ आंदोलनाची ओळख झाली होती. तर यावर्षी दूष्काळाची पृष्ठभूमी लक्षात घेता मागील आश्वासनांचा जाब व शेतकºयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती जागर मंचाने तयार केली असेल अशीच सर्वसामान्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र भाषणांचा तोच सुरू,तेच आरोप व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोच ठिय्या याची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनानेही मागील प्रमाणचे अश्वासनांचे लेखी पत्र देऊन ‘बोळवण’ करण्याची पुनरावृत्ती केली.

टॅग्स :AkolaअकोलाKasodha Parishadकासोधा परिषद