शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कासोधा परिषद; आंदोलनात जिंकली; चर्चेत हरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 18:30 IST

आंदोलनाची भूमिका तयार करण्यात जिंकलेली कसोधा परिषद प्रशासनासोबत चर्चा करताना हरली व जुन्याच वळणावर येऊन थांबल्याचे चित्र आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या गेल्या वर्षी झालेल्या कापूस, सोयाबीन, धान उत्पादन शेतकऱ्याची ‘कासोधा’ परिषद झाली. यशवंत सिन्हा सारखे देशव्यापी व थेट पंतप्रधान मोदींना भिडणारे नेतृत्व या आंदोलनाला मिळाल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरले. अकोल्यात कधी नव्हे तर भाजपा वगळता सर्वच पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा देत सहभाग घेतला. सरकारवर दबाव वाढला व थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले व आंदोलनाची सांगता झाली. मात्र वर्षभर या मागण्यांकडे सरकारने ढुंकनही पाहिले नाही त्यामुळे शेतकरी जागर मंचने दूसºया ‘कासोधा’ परिषदेची हाक देऊन वातावरण निर्मिती केली. यावेळी यशवंत सिन्हांच्या जोडीला शत्रुघ्न सिन्हा व आपच्या नेत्यांची भर पडली मात्र जुन्याच मागण्यांच्या पुर्ततेसाठी जुनाचा फंडा वापरण्याचा प्रयत्न झाला अन् अखेर पुन्हा आश्वासनांची भेेंडोळी हातात घेऊन परिषदेच्या आंदोलनाची सांगता झाली. कासोधा परिषदेच्या निमित्ताने शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या प्रत्यक्षात मात्र आंदोलनाची भूमिका तयार करण्यात जिंकलेली कसोधा परिषद प्रशासनासोबत चर्चा करताना हरली व जुन्याच वळणावर येऊन थांबल्याचे चित्र आहे.यशंवत सिन्हा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या गेल्यावर्षी तीन दिवस झालेले हे आंदोलन यावर्षी अवघ्या तीन तासात आटोपले. सिन्हांसह शेकडो आंदोलक पोलिस कवायत मैदानात ठाण मांडून बसले. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता,यावेळी प्रशासनानेही आधीच तयारी केली होती. तगडा बंदोबस्त अन् गावागावातील कार्यकर्त्यांना नोटीस बजावून आधीच धमकाविण्यात आले होते मात्र तरीही परिषदेवर फारसा फरक पडला नाही. दूसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या परिषदेसाठी जागर मंचला गावागावात जवळपास दोनशे बैठका पुर्वतयारीसाठी घ्याव्या लागल्या होत्या यावेळी मात्र एवढया मोठया प्रमाणात बैठकांची गरज भासली नाही कारण शेतकºयांना ‘कासोधा’ आंदोलनाची ओळख झाली होती. तर यावर्षी दूष्काळाची पृष्ठभूमी लक्षात घेता मागील आश्वासनांचा जाब व शेतकºयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती जागर मंचाने तयार केली असेल अशीच सर्वसामान्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र भाषणांचा तोच सुरू,तेच आरोप व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोच ठिय्या याची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनानेही मागील प्रमाणचे अश्वासनांचे लेखी पत्र देऊन ‘बोळवण’ करण्याची पुनरावृत्ती केली.

टॅग्स :AkolaअकोलाKasodha Parishadकासोधा परिषद