शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कापूस वेचणीला वेग!

By admin | Updated: November 16, 2016 02:16 IST

कापसाचा उतारा एकरी सरासरी सात ते आठ क्विंटल; नोटांच्या विमुद्रीकरणामुळे शेतकरी अडचणीत.

अकोला, दि. १५- विदर्भातील नगदी पीक कापूूस खरेदीला वेग आला असून, यावर्षी समाधानकारक व पोषक पाऊस झाल्याने कापसाचा एकरी उतारा सरासरी सात ते आठ क्विंटल लागला आहे; पण नोटांच्या विमुद्रीकरणाचा परिणाम कापूस विक्रीवर झाला आहे.राज्यात गतवर्षी ३८ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती. यावर्षी ३८ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र केवळ १३ हजार हेक्टरने कमी झाले आहे. समाधानकारक पावसामुळे उत्पादन होणार असल्याचे चित्र आहे. राज्यात मराठवाडा, खान्देश व सोलापूर जिल्हय़ांचा भाग तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्हय़ांत कापूस उत्पादन घेतले जाते. कापूस हे नगदी पीक आहे; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून कापसाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने विदर्भातील शेतकर्‍यांनी यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी केले. असे असले तरी पश्‍चिम विदर्भात आठ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पैदासकार, पायाभूत व प्रमाणित कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. या प्रक्षेत्रावरील कापूस बहरला असून, चंद्राप्रमाणे रात्री पांढर्‍या शुभ्र कापसाने शेतं उजळून निघाली आहेत. येथील उत्पादनही एकरी ८ ते ९ क्विंटल असल्याने पुढच्या वर्षी देशी कापसाचे बियाणे शेतकर्‍यांना सहज उपलब्ध होईल, अशी कृषी तज्ज्ञांना अपेक्षा आहे.

- कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कापूस फुलला असून, एकरी आठ ते नऊ क्विंटलचा उतारा (उत्पादन) येत आहे. त्यामुळे यावर्षीची स्थिती समाधानकारक आहे.डॉ. टी.एच. राठोड,विभाग प्रमुख,कापूस संशोधन, डॉ. पंदेकृवि, अकोला.