शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पाऊस लांबल्यास कापसाचा पेरा घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:06 IST

अकोला : मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

अकोला : मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरही पाऊस न आल्यास पिकात फेरबदल करावे लागणार असून, कपाशीचे सरळ, सुधारित वाण पेरणीसाठी योग्य राहील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी व भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तथापि, विदर्भात यंदा जून महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा संपला तरी पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. २२ जूनपर्यंत हे नक्षत्र राहील. त्यानंतर दुसरे नक्षत्र लागेल. ३० जूनपर्यंत दीड नक्षत्र संपलेले असेल. तोपर्यंत जर मान्सून आला नाही, तर शेतकºयांना पिकात बदल करावे लागणार आहेत.मागील काही वर्षात मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटले आहे. मागील दोन वर्षे तर शेतकºयांना एकरी सरासरी अर्धा ते एक क्विंटलच उत्पादन झाले. म्हणूनच यावर्षी मान्सून वेळेवर येईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पंरतु यावर्षीही अद्याप मान्सून पोहोचला नाही. आणखी उशीर झाला तर त्याचा परिणाम भूगर्भातील जलसाठ्यावर होईल.- मान्सून लांबल्यास सरळ वाण पेरा!मान्सून लांबल्यास शेतकºयांना संकरितऐवजी सरळ, सुधारित कपाशीची पेरणी करावी लागेल. त्यासाठी झाडाची संख्या वाढविणे गरजेचे आहे. म्हणजेच २० टक्के अधिक बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा लागेल.- ११ ते १७ जूनपर्यंत नॉर्मल स्थिती११ ते १७ जूनपर्यंत २४ वा हवामान आठवडानुसार ही स्थिती नार्मल समजली जाते. त्यानंतर दोन आठवडे पाऊस लांबला तर पिकात बदल करावे लागतात.- मान्सून येण्याची शक्यता वाढली आहे. ३० जूनपर्यंतही आला तर सामान्य पेरणी करता येईल. त्यानंतर जर आला नाही तर मूग, उडीद पीक पेरणीवर क ाही प्रमाणात परिणाम होईल; पण अलीकडे हवामान बदलाचे चित्र बघितल्यास उशिरा पाऊस होतो आणि पेरणीही उशिरा होते. त्यामुळे शेतकºयांनी चिंंता करू नये .डॉ. मोहन खाकरे,ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ,कृषी विद्यावेता,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस