शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

पाऊस लांबल्यास कापसाचा पेरा घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:06 IST

अकोला : मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

अकोला : मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरही पाऊस न आल्यास पिकात फेरबदल करावे लागणार असून, कपाशीचे सरळ, सुधारित वाण पेरणीसाठी योग्य राहील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी व भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तथापि, विदर्भात यंदा जून महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा संपला तरी पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. २२ जूनपर्यंत हे नक्षत्र राहील. त्यानंतर दुसरे नक्षत्र लागेल. ३० जूनपर्यंत दीड नक्षत्र संपलेले असेल. तोपर्यंत जर मान्सून आला नाही, तर शेतकºयांना पिकात बदल करावे लागणार आहेत.मागील काही वर्षात मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटले आहे. मागील दोन वर्षे तर शेतकºयांना एकरी सरासरी अर्धा ते एक क्विंटलच उत्पादन झाले. म्हणूनच यावर्षी मान्सून वेळेवर येईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पंरतु यावर्षीही अद्याप मान्सून पोहोचला नाही. आणखी उशीर झाला तर त्याचा परिणाम भूगर्भातील जलसाठ्यावर होईल.- मान्सून लांबल्यास सरळ वाण पेरा!मान्सून लांबल्यास शेतकºयांना संकरितऐवजी सरळ, सुधारित कपाशीची पेरणी करावी लागेल. त्यासाठी झाडाची संख्या वाढविणे गरजेचे आहे. म्हणजेच २० टक्के अधिक बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा लागेल.- ११ ते १७ जूनपर्यंत नॉर्मल स्थिती११ ते १७ जूनपर्यंत २४ वा हवामान आठवडानुसार ही स्थिती नार्मल समजली जाते. त्यानंतर दोन आठवडे पाऊस लांबला तर पिकात बदल करावे लागतात.- मान्सून येण्याची शक्यता वाढली आहे. ३० जूनपर्यंतही आला तर सामान्य पेरणी करता येईल. त्यानंतर जर आला नाही तर मूग, उडीद पीक पेरणीवर क ाही प्रमाणात परिणाम होईल; पण अलीकडे हवामान बदलाचे चित्र बघितल्यास उशिरा पाऊस होतो आणि पेरणीही उशिरा होते. त्यामुळे शेतकºयांनी चिंंता करू नये .डॉ. मोहन खाकरे,ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ,कृषी विद्यावेता,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस