शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

कापसाचे भाव वाढण्याचे संकेत!

By admin | Updated: November 22, 2014 23:34 IST

देशात आतापर्यंत २0 लाख गाठींची खरेदी.

अकोला: देशात चालू हंगामात आतापर्यंत कापसाची सर्वाधिक खरेदी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने केल्याचा, खासगी बाजारावर परिणाम झाल्याने, खासगी व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी सुरू केल्यामुळे, कापसाचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. देशात आतापर्यंंत २0 लाख गाठी कापूस खरेदी झाला असून, त्यापैकी सर्वाधिक कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. महाराष्ट्रात यावर्षी सुमारे ८0 लाख गाठी कापसाचे उत्पादन अपेक्षित असून, शेतकर्‍यांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास दीड लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी सीसीआयचा अभिकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ राज्यात प्रथमच कापसाची खरेदी करीत आहे. पणन महासंघाने राज्यात आणि सीसीआयने देशात थेट कापूस खरेदीचा धडाका लावला आहे. राज्यात आतापर्यंंत खरेदी करण्यात आलेल्या दीड लाख गाठींपैकी सुमारे ७0 ते ७५ टक्के कापूस एकट्या सीसीआयने खरेदी केला आहे. उर्वरित २५ ते ३0 टक्के कापूस खासगी व्यापार्‍यांनी खरेदी केला आहे. सीसीआय कापसाची खरेदी करीत असल्याने, खासगी बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील जवळपास सर्वच कापूस उद्योजक, व्यापार्‍यांनी कापूस खरेदी करण्यास सुरू वात केली असल्याने, नजिकच्या काळात कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. यावर्षी कापूस खरेदीबाबत, केंद्र सरकारचा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड)शी करार न झाल्याने, कापूस खरेदी कोण करणार, या प्रतीक्षेत कापूस खरेदीला विलंब झाला. शेवटी राज्यात सीसीआयचा अभिकर्ता म्हणून पणन महांसघ हमी दराने कापूस खरेदी करेल असा निर्णय झाल्यानंतर, १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाने राज्यात ३0 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. कापसाची आवक वाढत गेल्याने खरेदी केंद्राची संख्या ७0 पर्यंंत वाढविण्यात येत आह; पण कापसाचे हमी दर प्रति क्विंटल ३९00 ते ३९५0 पर्यंंत असल्याने, शेतकर्‍यांची कोंडी होत आहे; परंतु आता व्यापार्‍यांनीही कापूस खरेदीस सुरुवात केल्याने, बाजारात स्पर्धा निर्माण होऊन, कापसाचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.-बाजारातील प्रति क्विंटल दर ३९७५ शासकीय खरेदीचे हमी दर ३९00 ते ३९५0 रू पये प्रति क्विंटल असून, खासगी बाजारात ३९७५ रू पये प्रति क्विंटल भाव आहेत. व्यापार्‍यांनी पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी सुरू केल्यास, भाव चार हजाराच्या वर जाण्याची शक्यता, व्यापारी वतरुळात वर्तविण्यात येत आहे.