शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कापसाचे दर दोनशे रुपयांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:26 IST

अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे.

अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत देशात दररोज १ लाख ५० हजार, तर राज्यात ३५ हजार गाठींची आवक सुरू आहे.यावर्षी कापूस पीक पेरणीवर परिणाम झाला असून, राज्यात १० टक्के कापसाचे क्षेत्र घटले आहे. या परिस्थितीत राज्यात सध्या तरी दररोज १ लाख ७५ हजार क्विंटल (३५ हजार गाठी) कापसाची आवक सुरू आहे. अनेक भागात कापूस वेचणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. पाऊस कमी झाल्याचा परिणाम कापूस पिकांवर झाला आहे. पश्चिम विदर्भात शेकडो शेतकºयांनी कापसावर नांगर फिरवला असून, अनेक ठिकाणी कापसाची एक वेचणी झाल्यानंतर कापूस पीक संपले. भारी व काळ््या जमिनीत कापूस टिकून आहे. तथापि, तेथेही शेवटची कापसाची वेचणी आहे. त्यामुळे बाजारात कापसाची सध्या जी आवक आहे ती अशीच राहील, असे सांगता येत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. असे असताना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये वाढलेले दर अचानक २०० ते ३०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. पश्चिम विदर्भातील अकोट बाजारात सध्या हे दर घटून प्रतिक्विंटल ५,७०० ते ५,८०० रुपयांपर्यंत आहेत. काही भागात हेच दर ५,५०० ते ५,६५० रुपयांपर्यंत घटले आहेत.

 

कापसाची आवक सध्या राज्यात ३५ हजार गाठी आहे; पण दर दोन दिवसात २०० रुपयांची घटले आहेत. एक-दोन दिवसानंतर यात काय बदल होतो, त्यानंतरच पुढील दर काय असतील, हे कळेल.- बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस