शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कापूस वेचणी यंत्र तयार करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:43 IST

स्मार्ट’मधून निधी प्राप्त झाल्यास या कृषी विद्यापीठाला हे यंत्र तयार करू न त्याचा व्यावसायिक म्हणून विकास करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसून, वेचणीचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्राची प्रतीक्षा आहे. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हे यंत्र विकसित करण्यासाठीचे पाऊल उचलले आहे. शासनाच्या ‘स्मार्ट’ महाराष्टÑ राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत यंत्रासाठी निधीची तरतूद असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.राज्यात ४३ लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र आहे. यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे यांच्या कार्यकाळात कापूस वेचणी यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर व भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीने यासाठी निधी उपलब्ध केला होता. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत यंत्र विकासासाठी करारही करण्यात आला होता. यंत्राचे ५० टक्के कामही पूर्ण झाले होते. याअगोदर नामांकित कंपन्यांच्या यंत्राद्वारे कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर वेचणी प्रात्यक्षिकही घेण्यात आले. तथापि, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नंतर याकडे दुर्लक्ष झाले; परंतु आता मजुरांची वानवा व वाढलेले मजुरीचे दर बघता, या यंत्राची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने डॉ. मायंदे यांनी यंत्रासंबंधीचा प्रकल्प शासनाला सादर केला आहे. यासाठी अनुदान, निधीची गरज आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निधीची तरतूद आहे. ‘स्मार्ट’मधून निधी प्राप्त झाल्यास या कृषी विद्यापीठाला हे यंत्र तयार करू न त्याचा व्यावसायिक म्हणून विकास करता येणार आहे. कापूस वेचणीचे दर सध्या १० रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. हे यंत्र तयार झाल्यास शेतकऱ्यांचा कापूस वेचणी खर्च अर्धा होईल, असे डॉ. मायंदे यांचे म्हणणे आहे.दरम्यान, कापूस वेचणी करण्यासाठी कापूस पेरणीची पद्धत बदलावी लागणार असून, ७० टक्के कापूस एकाच वेळी वेचता यावा, तसे नियोजन करावे लागणार आहे. नवीन यंत्रामध्ये केवळ कापूसच वेचणी करता यावी, असे सेंसर लावण्यात येईल. त्यासाठी कापूस बियाणे संशोधनही करावे लागणार आहे. विदेशात मजूर नसल्याने यंत्राने कापूस वेचणी करण्यात येते. तथापि, त्यांच्याकडे एकाच वेचणीत कापूस काढला जातो. कापूस परिपक्क झाल्यानंतर त्यावर विशिष्ट प्रकारची औषधी फवारणी करू न पानगळ केली जाते. त्यानंतर यंत्राणे कापूस वेचणी करण्यात येते.

कापूस वेचणी यंत्र विकसित करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. विविध कंपन्यांसोबत यासंबंधी चर्चा झाली आहे. निधीची पूर्तता होताच काम हाती घेण्यात येणार आहे.- डॉ. विलास एम. भाले, कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ