शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कापसाने ओव्हरलोड भरलेला मालवाहू उलटला; तीन ठार, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथून कापूस भरून घेऊन जाणारा मिनीडोअर मालवाहू क्रमांक एमएच ०४ जीसी ९४२० हा तेल्हाऱ्याकडे अंदुरा-आडसूळ ...

बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथून कापूस भरून घेऊन जाणारा मिनीडोअर मालवाहू क्रमांक एमएच ०४ जीसी ९४२० हा तेल्हाऱ्याकडे अंदुरा-आडसूळ मार्गाने जात होता. अंदुरानजीक मालवाहू वाहनाचे एक्सल तुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८ एव्ही ३२८८ला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ओव्हरलोड असलेला मिनीडोअर मालवाहू उलटला. या खाली तीन जण दबल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृृतांमध्ये दुचाकीस्वार प्रल्हाद किसन अडकणे (६५) रा.दसरा नगर शेगाव, तर मालवाहू वाहनांवर बसलेले जाबीर शहा शब्बीर शहा (३२)आशा नगर अकोट व शे.मोबीन शे. इम्रान (३०), अकबरी प्लॉट अकोट यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ व तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी व अंदुरा सरपंच संजय वानखडे, आडसूळ सरपंच सदानंद नवलकार, पोलीस पाटील ज्ञानदेव रोहणकर, तलाठी सतीश कराड, तलाठी काकडे, कोतवाल राजू डाबेराव, शुभम नवलकार, शिवहरी बाहे यांनी सहकार्य करून वाहतूक सुरळीत केली. (फोटो)

--------------------------------------------------------