शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेच्या निकषात हवी सुधारणा - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 14:28 IST

२४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे.

- संतोष येलकरअकोला : पीक विमा योजना त्रुटीपूर्ण असल्याने, शेतकऱ्यांचा आक्रोश कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.दुष्काळी परिस्थिती असूनही बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी पीक विम्याच्या निकषात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये सिंचन सुविधा असलेल्या शेतकºयांसाठी आणि कोरडवाहू शेतकºयांसाठी पीक विमा योजनेत वेगवेगळे निकष ठरविण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक नुकसान भरपाईसाठी २४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारची सुधारणा सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात करणे आवश्यक आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. सरकारमार्फत सध्या राबविण्यात येत असलेली पीक विमा योजना त्रुटीपूर्ण असल्याने, यासंदर्भात शेतकºयांचा आक्रोश कमी करण्यासाठी पीक विमा योजनेच्या निकषात सुधारणा केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.महसूल मंडळ नव्हे, गाव घटक समजावे!पीक विमा योजनेत पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना पीक विम्याच्या लाभासाठी पात्र ठरविण्याकरिता महसूल मंडळनिहाय क्षेत्र घटक म्हणून समजण्यात येते; मात्र शेतकºयांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी महसूल मंडळ नव्हे, तर गावनिहाय क्षेत्र हा घटक समजण्यात यावा, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kishor Tiwariकिशोर तिवारीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती