शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नदी काठावरील नागरीकांच्या उपचारासाठी नगरसेवक सरसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:46 IST

नदी काठावरील स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेत सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देमनपा झोपेतनगरसेवकांच्या सूचनेवरून आरोग्य शिबिराचे आयोजन

अकोला : मोर्णा नदीपात्रात वाढलेली जलकुंभी व तुंबलेल्या सांडपाण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. नदी काठावरील स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेत सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. वातावरणातील बदलामुळे शहरात ‘व्हायरल फिवर’ची साथ पसरली आहे. यात भरीस भर मोर्णा नदीच्या पात्रातील जलकुंभीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत येणार्‍या मोर्णा नदी काठावरील अनिकट परिसर, कमला नेहरू नगर भागातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे हातपाय सुजणे, ताप येणे, खोकला, सर्दी, अंगदुखी अशा आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. कमलानगर येथील व्यायाम शाळेत आयोजित शिबिरात असंख्य लोकांनी सहभाग नोंदविला. मनपाच्यावतीने त्यांना औषधीचे वितरण करण्यात आले.   

आरोग्य विभाग करतो तरी काय? प्रभाग १२ अंतर्गत अनिकट भागातील नागरिक आजारामुळे हैराण झाल्याचे समजताच भाजपाच्या नगरसेवकांनी पुढाकार घेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. तत्पूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी केली असता, नागरिक आजारी असल्याचे समोर आले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असताना हा विभाग एरव्ही कोणते कर्तव्य बजावतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.