शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

CoronaVirus : ‘जीएमसी’मध्ये आजपासून १२० खाटांचा नवीन ‘वॉर्ड ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 09:49 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएसी) कोरोना रुग्णांसाठी १२० खाटांचा नवीन वॉर्ड शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

अकोला : अकोला शहरात दररोज वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब असल्याचे सांगत, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएसी) कोरोना रुग्णांसाठी १२० खाटांचा नवीन वॉर्ड शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘जीएमसी’मध्ये नवीन सुरू करण्यात येणाऱ्या १२० खाटांच्या वॉर्डमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना भरती करणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे काम करण्यात येणार आहे. अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक संबंधित क्षेत्रातून बाहेर येणार नाहीत, यासाठी त्या क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांना घरपोच अन्नधान्य पोहोचविणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वैद्यकीय सेवा आदी प्रकारच्या सुविधा त्याच भागात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘अ‍ॅक्शन प्लॅन’मधील विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनामार्फत तातडीने करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी तपासणी; रात्रीच्या वेळी फिरते रुग्णालय!अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रत्येक घरातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या एकत्रित तपासणीनंतर रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात रेडक्रॉस दवाखाना आणि रात्रीच्यावेळी फिरते रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.