शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus : 'जीएमसी' ओपीडीतील रुग्ण संख्या ८० टक्क्यांनी घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:57 IST

एरवी दोन-अडीच हजार रुग्णांची गर्दी असलेल्या सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता मात्र दिवसाला केवळ ४०० ते ५०० रुग्ण दिसून येतात.

ठळक मुद्देजिल्ह्यांच्या सीमाबंदी आणि संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून येणाºया रुग्ण संख्येत कमालीची घट दिसून येत आहे.सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता ४०० ते ५०० रुग्ण आढळून येत आहेत.

अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीचा परिणाम रुग्णालयातील रुग्ण संख्येवरही दिसून येत आहे. गत १५ दिवसांत सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी घटली आहे. एरवी दोन-अडीच हजार रुग्णांची गर्दी असलेल्या सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता मात्र दिवसाला केवळ ४०० ते ५०० रुग्ण दिसून येतात.सर्वोपचार रुग्णालयात अकोल्यासह जवळपासच्या जिल्ह्यातील शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील आहेत; परंतु कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यांच्या सीमाबंदी आणि संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून येणाºया रुग्ण संख्येत कमालीची घट दिसून येत आहे. म्हणूनच एरवी दोन-अडीच हजार रुग्णांची गर्दी असणाºया सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता ४०० ते ५०० रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अत्यावश्यक असेल, तरच उपचारासाठी येणाºया रुग्णांचा समावेश आहे. किरकोळ आजारी असणाºया रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. खासगी दवाखान्यातही अशा रुग्णांची गर्दी दिसून येत नाही. उपचाराच्या निमित्ताने लोक पडताहेत बाहेर सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाºया रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी, काही लोक उपचाराच्या नावाखाली बाहेर पडत असल्याचेही अनुभव डॉक्टरांना आले आहेत. सर्दी, खोकल्याचे रुग्ण जास्त सर्दी, खोकला आणि ताप येणे ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याने बहुतांश नागरिक कोरोनाच्या भीतीने थेट रुग्णालय गाठत आहेत; परंतु केवळ सर्दी, खोकला किंवा ताप म्हणजे कोरोना नव्हे. वातावरणातील बदलांमुळेदेखील या समस्या उद््भवू शकतात.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय