शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus : वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 09:57 IST

जंगलांमधून जाणाऱ्यांवरही वॉच ठेवण्यात येत असून, जंगलात असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना सुरू केली.

- सचिन राऊत

अकोला : वन विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या आरक्षित जंगलांमधून परप्रांतीय तसेच अनेकांची भटकंती होण्याचा धोका लक्षात घेता वन विभागाच्या राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जंगलांमधून जाणाऱ्यांवरही वॉच ठेवण्यात येत असून, जंगलात असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना सुरू केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.वन विभागाच्या आरक्षित जंगलांमध्ये मुक्त संचार करीत असलेल्या वन्य प्राण्यांना कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूंचा धोका असल्याचे वन विभागाच्या लक्षात येताच वन विभागाच्या आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यानंतर आता अनेक परप्रांतीय तसेच राज्यातील अंतर्गत गावांमध्ये पायी जाणाºयांनी काही जंगलांचा वापर सुरू केल्याचे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर या जंगलातील राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जंगलात असलेल्या गावात कोरोनाचा शिरकाव होण्यास ब्रेक लावण्याचे काम वन विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे. वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी तातडीने पावले उचलीत आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांना या संसर्गजन्य विषाणूपासून वाचविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याच आधारे आरक्षित जंगलांमध्ये असलेल्या राज्य नाक्यांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचा समावेश असलेले पथकच बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तात अलर्टचे कामकाज करीत आहेत. एमपी, तेलंगना आंध्रप्रदेशच्या सीमाराज्याला लागून मध्यप्रदेश, तेलंगना आंधप्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या सीमा असून, त्याला लागूनच मोठमोठी जंगले आहेत. या जंगलांमधूनच आता अनेकांनी प्रवास सुरू केल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वन विभागाच्या जंगलातील राज्य नाक्यांवर अलर्ट जारी करून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या वन विभागाच्या अधिकाºयांकडून करण्यात येत आहे. हरिसाल तसेच बैतुल या मार्गे मोठी जंगलं असल्याने मध्यप्रदेशातून येणारे अकोटमध्ये प्रवेश करीत असल्याची माहिती आहे. जंगलातील रहिवाश्यांना क ोरोनाचा धोका कमीराज्यातील वन विभागाच्या आरक्षित जंगलांमध्ये आजही अनेक गावे आहेत. या गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचली नसली तरी कोरोना पोहोचण्याचा धोका होता; मात्र आता वन विभागाच्या अधिकाºयांनी जंगलात बंदोबस्त लावत नाक्यांवर अलर्ट जारी केल्याने या गावातील रहिवाश्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती आहे; मात्र स्थलांतरामुळे या रहिवाशांना धोका निर्माण होत असल्याचे लक्षात घेताच उपाययोजना सुरू केल्याने जंगलातील रहिवासी पुन्हा सेफ झोनमध्ये आले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याforest departmentवनविभाग