शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

CoronaVirus : समन्वयाच्या अभावाने बिघडली अकोल्याची स्थिती - संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 10:15 IST

आमचं सरकार असतं तर परिस्थती वेगळी असती, असा टोलाही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्य सरकारला लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील कोरोनाबाधितांची स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत आहे. केवळ एक घटक या परिस्थितीला सावरू शकत नाही, सर्वांचे सहकार्य व समन्वय या माध्यमातूनच कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकता येईल. दुर्दैवाने अकोल्यात प्रशासनामध्ये नसलेल्या समन्वयामुळे स्थिती गंभीर झाली आहे, असा आरोप करत आमचं सरकार असतं तर परिस्थती वेगळी असती, असा टोलाही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्य सरकारला लगावला.केंद्र शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्य अहवाल देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महानगरांमध्ये होत आहे. अकोलाही त्याला अपवाद नाही. अकोल्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक असून, राज्य शासन व स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळेच येथील स्थिती बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. अकोल्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्याचा सर्वाधिक ताण हा शाासकीय महाविद्यालयावर येऊन ठेपला आहे. दुसरीकडे सुपर स्पेशालिटीची इमारत बांधून तयार आहे. येथे आवश्यक ती पदभरती करून हे हॉस्पिटल सुरू केले असते तर आताच्या परिस्थतीत रुग्णांसाठी त्याचा मोठा लाभ झाला असता; मात्र वेळावेळी पाठपुरावा करूनही राज्य शासनाने या हॉस्पिटलबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या आघाडीवर राज्य शासनाची कामगिरी ही ‘उत्तम’ आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. प्रशासन व शासन यांच्यामध्ये समन्वय हवाच; मात्र नागरिकांनीही अलगीकरणाची प्रक्रिया गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करीत पुढील दिवसांमध्ये आता स्वत: कोरोनाच्या संदर्भातील उपाययोजना व नियोजनावर लक्ष ठेवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याSanjay Dhotreसंजय धोत्रे