शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus : अकोल्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:23 IST

अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

ठळक मुद्देराज्यातील कोरोनामुक्तीचा दर हा अवघा ५४ टक्के आहे.मंगळवार संध्याकाळपर्यंत तब्बल १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अकोला शहरासह आता कोरोनाचे संक्रमण हे ग्रामीण भागातही पोहोचले असल्याने रुग्णवाढीचा वेग कायमच आहे. सद्यस्थिती जिल्ह्यात १ हजार ७७९ रुग्ण आहेत. रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असला तरी अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत तब्बल १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. विशेष म्हणजे राज्यातील कोरोनामुक्तीचा दर हा अवघा ५४ टक्के आहे. ही काही प्रमाणात दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये आता ऋतू बदलामुळेही अनेकांमध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. या लक्षणांमुळे घाबरून न जाता आपल्या फॅमिली किंवा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घ्या, गरजेनुसार तपासणी करून घ्या; मात्र सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी सौम्य लक्षणांबाबत तपासणी किंवा संशय असल्यास रीतसर वैद्यकीय चाचणी करवून घेतल्यास कोरोनाचे वेळेत निदान होण्यास मदत होईल. कोरोनाचा संसर्ग झाला, तरी वेळेत उपचार मिळाल्यास रुग्ण वेळेत बरा होऊ शकतो; मात्र साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोक्याचे ठरू शकते, असे आवाहन डॉ.सिरसाम यांनी केले आहे.

कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत; परंतु ज्यांना लक्षणे आढळून आली. सोबत त्यांना दुर्धर आजारही आहेत, अशा रुग्णांनी दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घ्यावा. योग्य वेळेत उपचार मिळाल्यास कोरोनातून बरे होऊ शकतात. जिल्ह्यातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला