शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

CoronaVirus in Akola : अनलॉकच्या ३३ दिवसांनी दिले १०७५ रुग्ण; ५५ मृत्यू

By atul.jaiswal | Updated: July 7, 2020 15:30 IST

अनलॉकच्या ४ जून ते ६ जुलै या ३३ दिवसांच्या कालावधीत तब्बल १,०७५ रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्देया काळात ५५ जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.अकोल्यात एकूण बाधितांची संख्या १,७४२ वर गेली आहे.

- अतुल जयस्वालअकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन ३ जूनपासून शिथिल झाल्यानंतर अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा खºया अर्थाने उद्रेक झाला. अनलॉकच्या ४ जून ते ६ जुलै या ३३ दिवसांच्या कालावधीत तब्बल १,०७५ रुग्णांची भर पडली. तर या काळात ५५ जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.अकोल्यात ‘मिशन बिगिन अंतर्गत’ ४ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली. तसेच संचाराचे नियम सैल करण्यात आले. नियम शिथिल होताच नागरिकांची बाजारपेठ व रस्त्यांवर वर्दळ वाढली. फिजिकल डिस्टन्स, मास्क न वापरणे यासारख्या नियमांचे पालन न झाल्यामुळे या कालावधीत संपर्कातून संसर्ग वाढत गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पहिला रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळून आलेल्या अकोल्यात लॉकडाऊन काळातही रुग्णसंख्या वाढत होती; मात्र अनलॉकनंतर रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला. ३ जून रोजी अकोल्यात एकूण बाधितांची संख्या ६६७ होती. तर कोरोनाच्या बळींचा आकडा ३४ होता. ४ जूननंतर यामध्ये झपाट्याने वाढ होत गेली. ६ जुलै रोजी अकोल्यात एकूण बाधितांची संख्या १,७४२ वर गेली आहे. तर मृतांचा आकडाही ८९ झाला आहे.८०८ जण कोरोनामुक्तअनलॉकमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी या काळात कोरोनामुक्त होणाºयांची संख्याही दिलासा देणारी आहे. अनलॉकपूर्वी ३ जून रोजी कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४७८ होती. अनलॉकच्या ३३ दिवसांमध्ये ८०८ जणांनी कोरोनावर मात केली. सहा जुलै रोजी आणखी २८ जण बरे झाल्याने कोरोनामुक्त होणाºयांचा एकूण आकडा १,२८६ वर गेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला