शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कोरोना: खाजगी रूग्णालय तातडीने अधिग्रहित करणे गरजेचे - रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:33 IST

कोरोना:खाजगी रूग्णालय तातडीने अधिग्रहित करणे गरजेचे - रणजीत पाटील

अकोला- शासकिय वैद्दकीय महाविद्दालय अर्थात कोविड रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण होत असल्यामुळे परिस्थीती अतिशय गंभीर होत चालली आहे.त्यामुळे अकोला महानगरातील एखादे मोठे खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तिथे कोरोना रूग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज केली.त्यांनी या मागणीचे एक लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.दरम्यान कोरोनाचे नमुने तपासणीसाठी आणखी एक लॅब सुरू करण्याचे त्यांनी या निवेदना द्वारे सुचविले आहे. अकोला शहरासह ग्रामिण भागातही कोरोना आजाराने शिरकाव केला आहे.अकोल्यात तर हि परिस्थीती हाताबाहेर जाते की काय अशी स्थीती निर्माण झाली आहे.हि परिस्थीती पाच ते सात दिवसांपासुन निर्माण झाली आहे.शासकीय कोवीड रूग्णालयाची क्षमता ८० टक्केच्या वर गेल्यानतंर तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहित करून तेथे कोरोना रूग्णांची उपचारासाठी व्यवस्था करावी अशा शासनाच्या सुचना असुनही अकोल्यात आतापर्यंत हा निर्णय का घेण्यात आला नाही.या बाबतही डॉ.रणजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तेथे संपुर्ण व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.असे रूग्णालय अधिग्रहीत करतांना तेथील सर्वच कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचा विमा शासनाने काढुन त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.अधिग्रहीत केलेल्या खाजगी रूग्णालयात भरती असलेल्या सर्व रूग्णांचा खर्च शासनाने करून तेथे सर्व सुविधा देण्यात याव्या असेही त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.

लॅबसाठी ५० लाख रूपये निधी देण्याची तयारी

अकोल्यात सुरू करण्यात आलेल्या लॅब मध्ये दिवसाला केवळ ९० नमुनेच तपासणी केली जातात.या लॅबवर तिन जिल्ह्याचा भार असुन जवळपास २०० च्यावर नमुने तपासणीसाठी बाकी आहेत.त्यामुळे आणखी एक लॅब असणे अत्यंत गरजेचे आहे.अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्दापीठात ही लॅब सुरू करता येते.मात्र हि लॅब सुरू करण्यासाठी ५० लाख रूपये खर्च आहे.यासाठी मी ५० लाख रूपये निधी देण्यास तयार आहे.मात्र हि लॅब सुरू करून कोरोना नमुने तपासणी संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी डॉ.रणजीत पाटील यांनी केली आहे.

खाजगी डॉक्टरांनाही विमा कवच देण्याची गरज

शासनाच्या आवाहनावरून अनेकांनी त्यांचे खाजगी रूग्णालयात सेवा देणे सुरू केले आहे.मात्र येणारा रूग्ण हा कोरोना बाधित आहे किंवा नाही याची माहिती त्या रूग्णाला व संबधित डॉकटरलाही नसते.त्यामुळे शहरातील दोन ते तिन डॉक्टरही कोरोना बाधित झाले आहेत.त्यामुळे खाजगी डॉक्टरांना शासनाने विमा कवच देणे गरजेचे आहे. शिवाय खाजगी रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णांचे नमुने तपासणी करून तसा अहवाल तातडीने दीला तर त्या रूग्णावर उपचार करचे सोपे होईल असे मतही डॉ रणजीत पाटील त्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील