शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोरोना: खाजगी रूग्णालय तातडीने अधिग्रहित करणे गरजेचे - रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:33 IST

कोरोना:खाजगी रूग्णालय तातडीने अधिग्रहित करणे गरजेचे - रणजीत पाटील

अकोला- शासकिय वैद्दकीय महाविद्दालय अर्थात कोविड रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण होत असल्यामुळे परिस्थीती अतिशय गंभीर होत चालली आहे.त्यामुळे अकोला महानगरातील एखादे मोठे खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तिथे कोरोना रूग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज केली.त्यांनी या मागणीचे एक लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.दरम्यान कोरोनाचे नमुने तपासणीसाठी आणखी एक लॅब सुरू करण्याचे त्यांनी या निवेदना द्वारे सुचविले आहे. अकोला शहरासह ग्रामिण भागातही कोरोना आजाराने शिरकाव केला आहे.अकोल्यात तर हि परिस्थीती हाताबाहेर जाते की काय अशी स्थीती निर्माण झाली आहे.हि परिस्थीती पाच ते सात दिवसांपासुन निर्माण झाली आहे.शासकीय कोवीड रूग्णालयाची क्षमता ८० टक्केच्या वर गेल्यानतंर तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहित करून तेथे कोरोना रूग्णांची उपचारासाठी व्यवस्था करावी अशा शासनाच्या सुचना असुनही अकोल्यात आतापर्यंत हा निर्णय का घेण्यात आला नाही.या बाबतही डॉ.रणजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तेथे संपुर्ण व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.असे रूग्णालय अधिग्रहीत करतांना तेथील सर्वच कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचा विमा शासनाने काढुन त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.अधिग्रहीत केलेल्या खाजगी रूग्णालयात भरती असलेल्या सर्व रूग्णांचा खर्च शासनाने करून तेथे सर्व सुविधा देण्यात याव्या असेही त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.

लॅबसाठी ५० लाख रूपये निधी देण्याची तयारी

अकोल्यात सुरू करण्यात आलेल्या लॅब मध्ये दिवसाला केवळ ९० नमुनेच तपासणी केली जातात.या लॅबवर तिन जिल्ह्याचा भार असुन जवळपास २०० च्यावर नमुने तपासणीसाठी बाकी आहेत.त्यामुळे आणखी एक लॅब असणे अत्यंत गरजेचे आहे.अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्दापीठात ही लॅब सुरू करता येते.मात्र हि लॅब सुरू करण्यासाठी ५० लाख रूपये खर्च आहे.यासाठी मी ५० लाख रूपये निधी देण्यास तयार आहे.मात्र हि लॅब सुरू करून कोरोना नमुने तपासणी संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी डॉ.रणजीत पाटील यांनी केली आहे.

खाजगी डॉक्टरांनाही विमा कवच देण्याची गरज

शासनाच्या आवाहनावरून अनेकांनी त्यांचे खाजगी रूग्णालयात सेवा देणे सुरू केले आहे.मात्र येणारा रूग्ण हा कोरोना बाधित आहे किंवा नाही याची माहिती त्या रूग्णाला व संबधित डॉकटरलाही नसते.त्यामुळे शहरातील दोन ते तिन डॉक्टरही कोरोना बाधित झाले आहेत.त्यामुळे खाजगी डॉक्टरांना शासनाने विमा कवच देणे गरजेचे आहे. शिवाय खाजगी रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णांचे नमुने तपासणी करून तसा अहवाल तातडीने दीला तर त्या रूग्णावर उपचार करचे सोपे होईल असे मतही डॉ रणजीत पाटील त्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील