शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना: खाजगी रूग्णालय तातडीने अधिग्रहित करणे गरजेचे - रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:33 IST

कोरोना:खाजगी रूग्णालय तातडीने अधिग्रहित करणे गरजेचे - रणजीत पाटील

अकोला- शासकिय वैद्दकीय महाविद्दालय अर्थात कोविड रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण होत असल्यामुळे परिस्थीती अतिशय गंभीर होत चालली आहे.त्यामुळे अकोला महानगरातील एखादे मोठे खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तिथे कोरोना रूग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज केली.त्यांनी या मागणीचे एक लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.दरम्यान कोरोनाचे नमुने तपासणीसाठी आणखी एक लॅब सुरू करण्याचे त्यांनी या निवेदना द्वारे सुचविले आहे. अकोला शहरासह ग्रामिण भागातही कोरोना आजाराने शिरकाव केला आहे.अकोल्यात तर हि परिस्थीती हाताबाहेर जाते की काय अशी स्थीती निर्माण झाली आहे.हि परिस्थीती पाच ते सात दिवसांपासुन निर्माण झाली आहे.शासकीय कोवीड रूग्णालयाची क्षमता ८० टक्केच्या वर गेल्यानतंर तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहित करून तेथे कोरोना रूग्णांची उपचारासाठी व्यवस्था करावी अशा शासनाच्या सुचना असुनही अकोल्यात आतापर्यंत हा निर्णय का घेण्यात आला नाही.या बाबतही डॉ.रणजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून तातडीने खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करून तेथे संपुर्ण व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.असे रूग्णालय अधिग्रहीत करतांना तेथील सर्वच कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचा विमा शासनाने काढुन त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.अधिग्रहीत केलेल्या खाजगी रूग्णालयात भरती असलेल्या सर्व रूग्णांचा खर्च शासनाने करून तेथे सर्व सुविधा देण्यात याव्या असेही त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.

लॅबसाठी ५० लाख रूपये निधी देण्याची तयारी

अकोल्यात सुरू करण्यात आलेल्या लॅब मध्ये दिवसाला केवळ ९० नमुनेच तपासणी केली जातात.या लॅबवर तिन जिल्ह्याचा भार असुन जवळपास २०० च्यावर नमुने तपासणीसाठी बाकी आहेत.त्यामुळे आणखी एक लॅब असणे अत्यंत गरजेचे आहे.अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्दापीठात ही लॅब सुरू करता येते.मात्र हि लॅब सुरू करण्यासाठी ५० लाख रूपये खर्च आहे.यासाठी मी ५० लाख रूपये निधी देण्यास तयार आहे.मात्र हि लॅब सुरू करून कोरोना नमुने तपासणी संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी डॉ.रणजीत पाटील यांनी केली आहे.

खाजगी डॉक्टरांनाही विमा कवच देण्याची गरज

शासनाच्या आवाहनावरून अनेकांनी त्यांचे खाजगी रूग्णालयात सेवा देणे सुरू केले आहे.मात्र येणारा रूग्ण हा कोरोना बाधित आहे किंवा नाही याची माहिती त्या रूग्णाला व संबधित डॉकटरलाही नसते.त्यामुळे शहरातील दोन ते तिन डॉक्टरही कोरोना बाधित झाले आहेत.त्यामुळे खाजगी डॉक्टरांना शासनाने विमा कवच देणे गरजेचे आहे. शिवाय खाजगी रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णांचे नमुने तपासणी करून तसा अहवाल तातडीने दीला तर त्या रूग्णावर उपचार करचे सोपे होईल असे मतही डॉ रणजीत पाटील त्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील