शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

काेराेना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 10:35 IST

Corona Virus : अनलाॅकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे.

अकाेला : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे अकाेल्यात कोविड रुग्णांची संख्या कमी हाेत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या कायम आहे. त्यामुळे काेराेनाचा धाेका अद्याप टळलेला नाही. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू करून सकाळी सात ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनलाॅकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत मुलांना घराबाहेर सोडू नका, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील वर्षभरात एक हजारापेक्षा जास्त चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाली असून, यातील बहुतांश बालरुग्ण मागील सहा महिन्यांतील असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येणारा काळ हा लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. कोरोनाचा धोका कायम असल्याने पालकांनी घरातील बालकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

 

निर्बंध शिथिल केल्यानंतर बेफिकीर झालेल्या नागरिकांनी वाहतूककाेंडी हाेईपर्यंत बाजारात प्रचंड गर्दी केली. या गर्दीतून अनेकांनी काेराेना घरी नेला असण्याची शक्यता आहे.

 

काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. आता तर डबल मास्क वापरण्याच्या सूचना आहेत; मात्र अनेक अकाेलेकर मास्कचा वापर हनुवटीवरच करताना दिसतात.

 

मंगल कार्यालये बंद आहेत. मात्र घरगुती स्वरूपात हाेणाऱ्या लग्न साेहळ्यांची गर्दी तसेच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी बाहेर फिरून वाटलेला काेराेनाचा ‘प्रसाद’.

 

जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेले राजकीय कार्यक्रम, बैठकांमधील गर्दीमुळेही काेराेनाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले.

 

पहिल्या लाटेत नागरिकांनी वैयक्तिक व कुटुंबाची काळजी घेतली, लक्षणे दिसताच चाचण्या केल्या. दुसऱ्या लाटेत मात्र वैयक्तिक काळजीचा भर ओसरलेेला दिसून आला. त्यामुळेच लक्षणे असूनही घरीच उपचार केल्याने रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात दाखल केल्यानेच मृत्युदर वाढलेला दिसला.

 

पालिकेचे केवळ एकच पथक

निर्बंध शिथिल झाल्यानंतर काेराेनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन हाेते का, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेने केवळ एका पथकाची नियुक्ती केली आहे.

मनपाने गठीत केलेल्या या पथकात केवळ आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यापूर्वी महापालिकेने पाच पथकांचे गठण केले हाेते. या पथकांनी झाेननिहाय दक्षता घेत काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली हाेती.

आता निर्बंध शिथिल केल्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यासाठी अधिक पथकाची गरज हाेती.