शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

काेराेना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 10:35 IST

Corona Virus : अनलाॅकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे.

अकाेला : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे अकाेल्यात कोविड रुग्णांची संख्या कमी हाेत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या कायम आहे. त्यामुळे काेराेनाचा धाेका अद्याप टळलेला नाही. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू करून सकाळी सात ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनलाॅकमध्ये केलेल्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ ठरणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत मुलांना घराबाहेर सोडू नका, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील वर्षभरात एक हजारापेक्षा जास्त चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाली असून, यातील बहुतांश बालरुग्ण मागील सहा महिन्यांतील असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येणारा काळ हा लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. कोरोनाचा धोका कायम असल्याने पालकांनी घरातील बालकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

 

निर्बंध शिथिल केल्यानंतर बेफिकीर झालेल्या नागरिकांनी वाहतूककाेंडी हाेईपर्यंत बाजारात प्रचंड गर्दी केली. या गर्दीतून अनेकांनी काेराेना घरी नेला असण्याची शक्यता आहे.

 

काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. आता तर डबल मास्क वापरण्याच्या सूचना आहेत; मात्र अनेक अकाेलेकर मास्कचा वापर हनुवटीवरच करताना दिसतात.

 

मंगल कार्यालये बंद आहेत. मात्र घरगुती स्वरूपात हाेणाऱ्या लग्न साेहळ्यांची गर्दी तसेच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी बाहेर फिरून वाटलेला काेराेनाचा ‘प्रसाद’.

 

जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेले राजकीय कार्यक्रम, बैठकांमधील गर्दीमुळेही काेराेनाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले.

 

पहिल्या लाटेत नागरिकांनी वैयक्तिक व कुटुंबाची काळजी घेतली, लक्षणे दिसताच चाचण्या केल्या. दुसऱ्या लाटेत मात्र वैयक्तिक काळजीचा भर ओसरलेेला दिसून आला. त्यामुळेच लक्षणे असूनही घरीच उपचार केल्याने रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात दाखल केल्यानेच मृत्युदर वाढलेला दिसला.

 

पालिकेचे केवळ एकच पथक

निर्बंध शिथिल झाल्यानंतर काेराेनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन हाेते का, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेने केवळ एका पथकाची नियुक्ती केली आहे.

मनपाने गठीत केलेल्या या पथकात केवळ आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यापूर्वी महापालिकेने पाच पथकांचे गठण केले हाेते. या पथकांनी झाेननिहाय दक्षता घेत काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली हाेती.

आता निर्बंध शिथिल केल्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यासाठी अधिक पथकाची गरज हाेती.