शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

अकोला जिल्ह्यातील कोरोनाला ७८१ गावांनी वेशीवरच रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:02 IST

जिल्ह्यातील ७८१ गावांनी कोरोनाला आपल्या वेशीवरच रोखल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून, गुरुवारी आणखी २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्वच रुग्ण ग्रामीण भागातील असून, २१ पैकी २० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. एकीकडे असे चित्र असले तरी जिल्ह्यातील ७८१ गावांनी कोरोनाला आपल्या वेशीवरच रोखल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात अकोला शहरातून कोरोनाचा शिरकाव झाला. सात एप्रिल रोजी बैदपुरा येथील पहिला रुग्ण आढल्यानंतर कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यानंतर अकोला शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट झाले. विदर्भात सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू, अशी अकोल्याची जुलैच्या मध्यापर्यंत स्थिती होती; मात्र त्याही परिस्थितीत ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव फारसा झाला नव्हता. जुलैच्या मध्यानंतर मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने विळखा बसत आहे. सर्वात आधी पातूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा अशा तालुक्यांमध्ये विळखा घट्ट होत गेला.या पृष्ठभूमीवरही ७८१ गावांंनी कोरोनाची बाधा होण्यापासून गावाला वाचविले आहे. त्यामागे ग्रामपंचायतचा पुढाकार, ग्रामस्थांचे सहकार्य, कोरोना प्रतिबंधक नियमांचे कटाक्षाने पालन व आजार न लपविता आरोग्य विभागाचा सल्ला घेऊन केलेले उपचार याचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे.‘गाव करी ते राव न करी’ असे म्हटले जाते; परंतु कोरोनाच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय ही लढाई जिंकता आली नसती, हेही तितकेच खरे. अनेक गावांत गावपातळीवर सीमाबंदी करण्यात आली होती; परंतु याचा फायदा झाला. कामानिमित्ताने ग्रामीण भागातून शहरात नागरिकांना जाणे आवश्यक होते. बाहेर जाताना पोलिसांच्या धाकाने तोंडावर रुमाल अथवा मास्क लावून जाणे बंधनकारक असल्याने तो नियम पाळल्या गेला. बहुतेक गावात सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्यात आला.काही गावांमध्ये बांधावर खते व बियाणे या योजनेचा फायदा झाला; मात्र त्यापासून अनेक गावे वंचितच राहिले होते.या गावातील ग्रामस्थांनी बियाणे व रासायनिक खतांकरिता शेतकरी कृषी केंद्रावर जाऊन दुसरे काही खरेदी न करता स्वत:ची काळजी घेत सरळ घरी परतण्याची दक्षता घेतल्याने संसर्ग टाळता आला.

कोरोनामुक्त गावेजिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ७४, अकोला १५0, मूर्तिजापूर १२८, बार्शीटाकळी ११२, पातूर ८९, तेल्हारा 0६ व अकोट तालुक्यात १२२ गावे कोरोनामुक्त राहिली आहे. या ग्रामस्थांनी आतापर्यंत घेतलेली काळजी पुढेही कायम ठेवली तर कोरोना वेशीवरच थांबेल.

प्रवाशांची नोंद अन् प्राथमिक तपासणीबाहेरगावाहून तालुक्यात येणाऱ्यांची माहिती ठेवून. त्यांची तपासणी करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांनी केले. कोरोनासदृश लक्षणांबाबत प्राथमिक माहिती देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच साथीचे आजार पसरणार नाहीत, याची दक्षता घेतली.

अंगणवाडी ताई, आशा कोरोना योद्धा!अंगणवाडी ताई, आशा वर्कर्स या पहिल्या फळीतील कोरोना योद्धा ठरल्या. प्रत्येक घरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी कोरोनाबाबत माहिती दिली. कोणी आजारी आहे का, याची नोंद घेतली. आरोग्य तपासणीसाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. कोरोनाची भीती न बाळगता त्या कार्यरत राहिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला