शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मानसिक आरोग्य सांभाळण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:16 IST

नागरिकांनी सकारात्मक विचार करून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

अकोला : गत सहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, त्याचे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागले आहेत. कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे नैराश्यामध्ये वाढ होत असून, त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सकारात्मक विचार करून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना, या चिंतेत अनेक नकारात्मक विचार नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे नैराश्याचे वातावरण निर्माण होत असून, त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या शिवाय, समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीच्या आधारावर विविध घरगुती प्रयोग करतात. त्याचेही दुष्परिणाम दिसू लागतात. अशा परिस्थितीत मानसिक स्वस्थ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी आवश्यक उपाय करण्याची गरज आहे.असे जपा मानिसक आरोग्य

  • चुकीच्या माहितीपासून सावध राहा
  • खात्रीशीर माध्यमांवरूनच कोरोनाविषयी माहिती घ्या
  • काळजी वाढविणाऱ्या गोष्टींमध्ये मर्यादित वेळ घालवा
  • सोशल मीडियापासून ब्रेक
  • कोरोनाविषयी अपडेट राहणे आवश्यक आहे; मात्र खात्रीशीर स्रोतांवरच विश्वास ठेवा
  • चुकीची माहिती देणारे अकाउंट्स, हॅशटॅग्स वा फिरणारे मेसेजेस यापासून दूर राहा
  • सोशल मीडियापासून दूर राहून टीव्हीवर वेगळे काहीतरी बघा
  • किंवा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा

आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी हे करा!जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आजारानंतरचा स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन मॅनेज करणे हा देखील आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी, कोविडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा. अ‍ॅक्टिव्ह राहावे ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावे, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावे. ब्रेन एक्सरसाइज करावेत, जेणेकरून स्मृती वाढविण्यास मदत होईल.

कोरोनामुळे अनेकांमध्ये नैराश्य वाढल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम आरोग्यावरदेखील होत आहे. यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करावा. कोरोनापासून बचावासाठी खबरदारी तर घ्यावी; पण चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाता सकारात्मक विचार आणि सकस आहार घ्यावा.- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या