शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मानसिक आरोग्य सांभाळण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:16 IST

नागरिकांनी सकारात्मक विचार करून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

अकोला : गत सहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, त्याचे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागले आहेत. कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे नैराश्यामध्ये वाढ होत असून, त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सकारात्मक विचार करून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना, या चिंतेत अनेक नकारात्मक विचार नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे नैराश्याचे वातावरण निर्माण होत असून, त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या शिवाय, समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीच्या आधारावर विविध घरगुती प्रयोग करतात. त्याचेही दुष्परिणाम दिसू लागतात. अशा परिस्थितीत मानसिक स्वस्थ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी आवश्यक उपाय करण्याची गरज आहे.असे जपा मानिसक आरोग्य

  • चुकीच्या माहितीपासून सावध राहा
  • खात्रीशीर माध्यमांवरूनच कोरोनाविषयी माहिती घ्या
  • काळजी वाढविणाऱ्या गोष्टींमध्ये मर्यादित वेळ घालवा
  • सोशल मीडियापासून ब्रेक
  • कोरोनाविषयी अपडेट राहणे आवश्यक आहे; मात्र खात्रीशीर स्रोतांवरच विश्वास ठेवा
  • चुकीची माहिती देणारे अकाउंट्स, हॅशटॅग्स वा फिरणारे मेसेजेस यापासून दूर राहा
  • सोशल मीडियापासून दूर राहून टीव्हीवर वेगळे काहीतरी बघा
  • किंवा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा

आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी हे करा!जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आजारानंतरचा स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन मॅनेज करणे हा देखील आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी, कोविडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा. अ‍ॅक्टिव्ह राहावे ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावे, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावे. ब्रेन एक्सरसाइज करावेत, जेणेकरून स्मृती वाढविण्यास मदत होईल.

कोरोनामुळे अनेकांमध्ये नैराश्य वाढल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम आरोग्यावरदेखील होत आहे. यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करावा. कोरोनापासून बचावासाठी खबरदारी तर घ्यावी; पण चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाता सकारात्मक विचार आणि सकस आहार घ्यावा.- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या