शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वृद्धांसाठी कोरोना ठरतोय ‘किलर’; ७१ टक्के बळी ६० पेक्षा अधिक वयाचे

By atul.jaiswal | Updated: September 15, 2020 11:16 IST

सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ३४ रुग्णांपैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील होते.

ठळक मुद्दे२५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६० ते ७० वयोगटातील १४ तर ७० ते ८० वयोगटातील ११ जणांचा समावेश आहे.५० ते ६० या वयोगटातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने सर्वच वयोगटातील लोकांना कवेत घेतले असले, तरी वयोवृद्धांसाठी हा संसर्गजन्य आजार जीवघेणा ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ३४ रुग्णांपैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील होते.एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर अकोला शहर व जिल्ह्यात कोरोना चांगलाच फोफावला असून, दररोज शंभरपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५७३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, सद्यस्थितीत ११७३ पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये सर्वच वयोगटातील लोकांचा समावेश आहे. कोरोनाने आतापर्यंत घेतलेल्या एकूण १८६ बळींपैकी ३४ बळी हे सप्टेंबर महिन्यातील आहेत. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांतील कोरोनाबळींच्या संख्येचे विश्लेषण केले असता, यापैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६० ते ७० वयोगटातील १४ तर ७० ते ८० वयोगटातील ११ जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे तरुणांचाही मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत; परंतु हे प्रमाण नगन्य आहे. या कालावधीत ३० ते ४० या वयोगटातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० ते ५० या वयोगटातील केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. ५० ते ६० या वयोगटातील ५ जणांचा मृत्यू सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये झाला आहे.नऊ पैकी सात महिला ५० पेक्षा अधिक वयाच्यासप्टेंबर महिन्यात १४ तारखेपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण ३४ जणांमध्ये नऊ महिलांचाही समावेश आहे. या महिला विविध वयोगटातील आहेत. यापैकी दोन महिला या ४० पेक्षा कमी वयाच्या , तर इतर सात महिला या ५० ते ७० या वयोगटातील असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.

आजार गंभीर झाल्यावर उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंगावर दुखणे काढल्यामुळे आजार बळावतो. त्यानंतर अशा रुग्णांना वाचविणे कठीण होते. नागरिकांनी कुठलेही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेवर उपचार मिळून प्राण वाचू शकतात.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला