शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोना : ३० जण पसार झाल्यानंतर आश्रयस्थानांवरील सुरक्षेत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 10:44 IST

जिल्ह्यातील सर्वच आश्रयस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पातूर येथील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात आश्रय दिलेल्या बाहेरगावच्या मजूर, विद्यार्थ्यांनी मंगळवारी मध्यरात्री पलायन केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्ह्यातील सर्वच आश्रयस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पातूर येथून पळून गेलेले मजूर कोरोनाचे संदिग्ध रुग्ण नव्हते. त्यामुळे ते ‘क्वारंटीन नव्हतेच फक्त लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले होते त्यामुळे भीतीचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे आणि वाहनांची सुविधा नसल्यामुळे पातूर पोलीस व तहसील प्रशासनाने इतर राज्य व जिल्ह्यांमधील मजूर, विद्यार्थ्यांना पातूर येथील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनामध्ये आश्रय दिला आहे. त्यांच्या राहण्याची, भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. असे असतानासुद्धा घरी जाण्याच्या ओढीने आश्रयस्थानामधील मजूर व काही विद्यार्थी मंगळवारी मध्यरात्री पसार झाले. हे सर्व जण केवळ लॉकडाऊनमुळे ते अडकले होत त्यामुळे त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली होती. या व्यवस्थेत त्यांना नाश्ता, भोजन व मनोरंजनांची साधनेही पुरविण्यात आली होती हे सर्व लोक कोरोनाचे संदिग्ध रुग्ण नव्हते.त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आश्रयस्थानांवर परराज्य व इतर जिल्ह्यांतील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांची निवास, भोजनासह व्यवस्था करण्यात आली. संचारबंदी संपल्यानंतर या सर्व लोकांना सोडण्यात येणार आहे. परराज्य व इतर जिल्ह्यांतील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांनी आश्रयस्थान सोडू नये, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर खबरदारी म्हणून सहकार्य करावे, त्यासाठी जिल्ह्यातील आश्रयस्थानांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPaturपातूर