शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोरोनाची धास्ती; रॅपिड टेस्टसाठी अनेकांची टाळाटाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 10:39 IST

अजूनही अनेकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याने लोक तपासणीसाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने तपासण्यांची गती वाढविण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टचा आधार घेतला आहे; परंतु अजूनही अनेकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याने लोक तपासणीसाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.कोरोना संसर्गाची भीती अनेकांमध्ये असली, तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत; मात्र तपासणीची वेळ आली की, लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. आशांच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्वेक्षणानंतर लक्षणं आढळलेल्या लोकांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट केली जात आहे; मात्र बहुतांश लोक भीतीपोटी कोरोनाची चाचणी करण्यास टाळत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

साखळी तुटेल,तरच कोरोना हरेल!नागरिकांनी कोरोनाविषयीची भीती बाळगण्याऐवजी त्या विरोधात लढण्यासाठी स्वत:हून तपासणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे कोरोनाचे काही मीनिटामध्येच निदान होते. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे सहज शक्य होईल. त्यामुळे नागरिकांनी मनात भीती न बाळगता कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

ग्रामीण भागातील काही ठिकाणी कोरोनाच्या चाचणीसाठी काही लोकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले; परंतु कोरोनाला घाबरुन चालणार नाही. कोरोनाच्या संसर्गाची चेन तोडायची असेल, तर लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाने कोेरोनाची चाचणी करून घ्यावी.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक , अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या