शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

कोरोनामुळे स्थानिक पर्यटनाकडे वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:25 IST

महान धरण, वान प्रकल्प, माळराजुरा, मोर्णा अशा प्रकल्पांसह काटेपूर्णा जंगल भ्रमंतीसाठी पर्यटकांची पसंत मिळत असल्याचे चित्र आहे.

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सर्वाधिक फटका हा पर्यटन उद्योगाला बसला आहे. अनलॉकनंतर आता जिल्हाबंदी संपुष्टात आली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनासाठी निघणाऱ्यांची संख्या मर्यादितच असून, हे पर्यटक स्थानिक स्थळांनाच भेटी देण्यास पसंती दर्शवित असल्याचे स्पष्ट झाले आहे.२४ मार्चच्या लॉकडाऊननंतर सर्व अर्थकारणच ठप्प झाले. एप्रिल व मे हे दोन महिने पर्यटनाचे महिने असतात; मात्र या दोन महिन्यातच कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक होता, तसेच लॉकडाऊन होते त्यामुळे अनेक पर्यटकांना आपल्या नियोजित सहली रद्द कराव्या लागल्यात. उन्हाळ्यानंतर पावसाळी पर्यटनासाठीही अनेक पर्यटक उत्सुक असतात; मात्र कोरोनामुळे हे पर्यटनही बुडाले. आता १ सप्टेंबरपासून अनलॉकची प्रक्रिया व्यापक झाली. एसटी सुरू झाली, मर्यादित प्रमाणात रेल्वे व विमानसेवाही सुरू आहे. जिल्हाबंदीही संपुष्टात आली; मात्र कोरोनाचा प्रसार वाढताच असल्याने पर्यटक धास्तावलेलेच आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून घर व आपल्याच शहरात बंदिस्त झालेल्या पर्यटकांनी आता स्थानिक पर्यटनस्थळांना पसंती दर्शविली आहे. यावर्षी पाऊसही भरपूर झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे. या प्रकल्पांच्या स्थळी भेट देऊन जंगल भ्रमंती करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. महान धरण, वान प्रकल्प, माळराजुरा, मोर्णा अशा प्रकल्पांसह काटेपूर्णा जंगल भ्रमंतीसाठी पर्यटकांची पसंत मिळत असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणWan Projectवान प्रकल्पtourismपर्यटन