शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

कोरोना : सरकारने हिंमत देण्याऐवजी भीती दाखविली - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:40 IST

सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जागतिक महामारीचे स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊनसारखा मार्ग निवडला गेला. गेल्या तीन महिन्यात सरकारने नागरिकांना हिंमत देण्याऐवजी प्रत्येक दिवशी नागरिकांसमोर भीतीचे वातावरण तयार करून इतर मुद्यांवरील अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्यापूर्वीच धोक्यात आली होती. आता कारोनाचे निमित्त पुढे करून सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.अ‍ॅड. आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या नावावर या सरकारने स्थलांतरित मजुरांचे हाल केले. तब्बल १५ कोटी मजूर उपाशीपोटी पायीपायी आपल्या घराकडे परतले. कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षाही या मजुरांची वेदना मोठी आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कोरोनाच्याच भोवती शासन व प्रशासन फिरवित ठेवत इतर आघाड्यांवर सरकारला आलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. कोरोनाची रुग्णसंख्या कमी असताना लॉकडाऊन कडक व आता रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनलॉकची प्रक्रिया वेगात असा विरोधाभासी निर्णय घेणारे सरकार कोरोनाची खरी आकडेवारीही लपवित असून, नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचेही ते म्हणाले. केंद्र शासन निर्णय घेत नाही. राज्य शासनाला निर्णयाचे अधिकार देते. राज्य शासन स्थानिक प्रशासनाला अधिकार देते व प्रशासनात समन्वय नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर