शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कोरोना : सरकारने हिंमत देण्याऐवजी भीती दाखविली - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:40 IST

सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जागतिक महामारीचे स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊनसारखा मार्ग निवडला गेला. गेल्या तीन महिन्यात सरकारने नागरिकांना हिंमत देण्याऐवजी प्रत्येक दिवशी नागरिकांसमोर भीतीचे वातावरण तयार करून इतर मुद्यांवरील अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्यापूर्वीच धोक्यात आली होती. आता कारोनाचे निमित्त पुढे करून सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.अ‍ॅड. आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या नावावर या सरकारने स्थलांतरित मजुरांचे हाल केले. तब्बल १५ कोटी मजूर उपाशीपोटी पायीपायी आपल्या घराकडे परतले. कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षाही या मजुरांची वेदना मोठी आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कोरोनाच्याच भोवती शासन व प्रशासन फिरवित ठेवत इतर आघाड्यांवर सरकारला आलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. कोरोनाची रुग्णसंख्या कमी असताना लॉकडाऊन कडक व आता रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनलॉकची प्रक्रिया वेगात असा विरोधाभासी निर्णय घेणारे सरकार कोरोनाची खरी आकडेवारीही लपवित असून, नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचेही ते म्हणाले. केंद्र शासन निर्णय घेत नाही. राज्य शासनाला निर्णयाचे अधिकार देते. राज्य शासन स्थानिक प्रशासनाला अधिकार देते व प्रशासनात समन्वय नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर