शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोरोना : जिल्ह्यात मृत्यूच्या आकड्यात गौडबंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार बुधवारी दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात ...

जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार बुधवारी दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली; परंतु दुपारपर्यंत स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत आणि स्मशानभूमीतून मिळालेल्या मृतांच्या आकडेवारीत माेठी तफावत आढळली. या प्रकरणाची ‘लोकमत’ने शहानिशा केली असता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी, बुधवारी दिवसभरात १२ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यापैकी पाच रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील, तर सात रुग्ण जिल्ह्यातील असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे देण्यात आली, तसेच एक रुग्ण खासगी रुग्णालयातील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून मिळाली. जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी माहिती आणि प्रत्यक्षात स्मशानभूमीत होणारे अंत्यविधी या संख्येत तफावत आढळल्याने उर्वरित मृत्यूच्या नोंदीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

काय म्हणतात आकडे !

जिल्हा प्रशासन- ४

‘जीएमसी’ प्रशासन- १२

रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही!

जिल्ह्यातील अनेक नॉनकोविड रुग्णालयांत केवळ सीटी स्कॅन अहवालाच्या आधारे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी मृत्यू हाेणाऱ्या काेविड रुग्णांची नोंद होत नसल्याचेही समोर आले आहे.

काय म्हणतात अधिकारी?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दिवसभरात दोन टप्प्यांत आकडेवारी प्राप्त होते. त्याच माहितीची नोंद जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत घेतली जाते.

- डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दुपारी ४ वाजेपर्यंतच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जाते. त्यानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी सकाळच्या अहवालात दिली जाते. यामध्ये केवळ जिल्ह्यातील रुग्णांचाच समावेश केला जातो. जिल्ह्याबाहेरील रुग्णाची माहिती संंबंधित जिल्हा प्रशासनाला दिली जाते. - डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.