शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

कोरोना कमी होतोय; वीकेंडचे निर्बंध हटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 10:34 IST

When will the weekend restrictions be lifted : लॉकडाऊनमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती सावरली नाही.

अकोला : गत दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे; मात्र जिल्ह्यात शनिवार व रविवारी निर्बंध कायम आहे. आधीच लॉकडाऊनमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती सावरली नाही. त्यात वीकेंडचे निर्बंध अद्यापही न हटल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे वीकेंडचे व दररोज सायंकाळी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्बंध हटणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या लाटेत नुकसान सोसावे लागल्यानंतर दुसऱ्या लाटेने व्यापाऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात अद्यापही निर्बंध कायम असून, सायंकाळी चारपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. तसेच शनिवार, रविवार वीकेंडचे निर्बंधही कायम आहे; मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दिवसाला केवळ पाच-सहा रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहे. यासोबत मृत्यूचे प्रमाणही घटले आहे; परंतु जिल्ह्यात अद्यापही वीकेंडचे व सायंकाळी चारपर्यंत निर्बंध कायम असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. रुग्णसंख्या घटल्याने वीकेंडचे निर्बंध हटविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

बेरोजगारीचे संकट गडद

कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगारही अडचणी आले आहे. व्यवसाय होत नसल्याने जास्त अर्थचक्र कोलमडले असून, जास्त कामगारांना कामावर ठेवण्याची गरज व्यावसायिकांना भासत नाही. त्यामुळे बेरोजगारीचे संकट आणखी गडद झाले आहे.

 

खरंच गरज आहे का?

शहरात इतर दिवसांप्रमाणे शनिवार, रविवारीदेखील गर्दी दिसून येते. तसेच दररोज सायंकाळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतो. आता रुग्णसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे निर्बंधांची खरंच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शनिवार, रविवारी सुटी असल्याने ग्राहक याच दिवशी खरेदीसाठी येतात. या दोन दिवसांमध्ये चांगला व्यवसाय होतो. आता कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे वीकेंड निर्बंधांची मुळीच आवश्यकता दिसून येत नाही.

- भीकमचंद अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक

 

जिल्ह्यात रुग्ण कमी झाले आहे. बहुतांश नागरिकांचे लसीकरणही झाले आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविण्याची गरज आहे. वीकेंड निर्बंधांचीही गरज नाही. शासनाने हे सर्व निर्बंध हटविणे आवश्यक आहे.

- किशोर मांगटे, कपडा व्यावसायिक

निर्बंध असल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहे. अपेक्षित व्यवसायही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने किमान सायंकाळची वेळ सातपर्यंत करणे आवश्यक आहे.

- रिषी जाधवाणी, फुटवेअर व्यावसायिक

 

निर्बंधांमुळे फळ व्यवसाय मंदावला आहे. फळ व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होत आहे. सायंकाळी चारनंतर फळांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची गरज आहे. तसेच वीकेंड निर्बंधही हटवावी.

- मुजाहिद खान, फळ व्यावसायिक

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकAkolaअकोला