शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : लसीकरणातील ४५ दिवस महत्त्वाचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST

अकोला : कोविड लस घेतल्याने आता कोरोनापासून सुटका झाली, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे; मात्र लसीच्या दोन्ही डोसचा ४५ ...

अकोला : कोविड लस घेतल्याने आता कोरोनापासून सुटका झाली, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे; मात्र लसीच्या दोन्ही डोसचा ४५ दिवसांचा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत बेफिकिरी बाळगल्यास कोरोनाचा धोका निश्चितच आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात गत महिन्यापासून कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकजण निर्धास्त झाले. आता आपण सुरक्षित आहोत, आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, या आविर्भावावत अनेकजण होते. मात्र दरम्यानच्या काळात काही लोकांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे लस असुरक्षित आहे का, असा प्रश्नही अनेकांकडून उपस्थित करण्यात आला. परंतु, तज्ज्ञांच्या मते कोविडवरील ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर बाळगलेल्या बेफिकिरीमुळे काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लस ही दोन डोसमध्ये घ्यावी लागते. या दोन्ही डोसांदरम्यानचा ४५ दिवसांचा कालावधी हा महत्त्वाचा असतो. याच कालावधीत लसीच्या लाभार्थ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. परंतु, अनेकजण निर्धास्त होऊन फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही किमान २० दिवस विशेष खबरदारी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

दोन डोसनंतरच वाढतील ॲन्टिबॉडीज

कोरोनावरील लस ही प्रामुख्याने शरीरातील ॲन्टिबॉडीज वाढविण्याचे काम करते. त्यासाठी जवळपास ४५ दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लस घेतल्यावरही नागरिकांनी गाफील न राहता विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

मास्क लावा, सुरक्षित राहा

कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही प्रमाणात धोका कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह लस घेतलेल्या प्रत्येकाने नियमित मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित झालो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. लस ही सुरक्षित आहे. लसीकरणातील ४५ दिवस महत्त्वाचे आहेत, मात्र त्यानंतरही प्रत्येकाने त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाच्याच सहभागाची गरज आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ