शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोरोना : लसीकरणातील ४५ दिवस महत्त्वाचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST

अकोला : कोविड लस घेतल्याने आता कोरोनापासून सुटका झाली, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे; मात्र लसीच्या दोन्ही डोसचा ४५ ...

अकोला : कोविड लस घेतल्याने आता कोरोनापासून सुटका झाली, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे; मात्र लसीच्या दोन्ही डोसचा ४५ दिवसांचा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत बेफिकिरी बाळगल्यास कोरोनाचा धोका निश्चितच आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात गत महिन्यापासून कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकजण निर्धास्त झाले. आता आपण सुरक्षित आहोत, आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, या आविर्भावावत अनेकजण होते. मात्र दरम्यानच्या काळात काही लोकांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे लस असुरक्षित आहे का, असा प्रश्नही अनेकांकडून उपस्थित करण्यात आला. परंतु, तज्ज्ञांच्या मते कोविडवरील ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर बाळगलेल्या बेफिकिरीमुळे काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लस ही दोन डोसमध्ये घ्यावी लागते. या दोन्ही डोसांदरम्यानचा ४५ दिवसांचा कालावधी हा महत्त्वाचा असतो. याच कालावधीत लसीच्या लाभार्थ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. परंतु, अनेकजण निर्धास्त होऊन फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही किमान २० दिवस विशेष खबरदारी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

दोन डोसनंतरच वाढतील ॲन्टिबॉडीज

कोरोनावरील लस ही प्रामुख्याने शरीरातील ॲन्टिबॉडीज वाढविण्याचे काम करते. त्यासाठी जवळपास ४५ दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लस घेतल्यावरही नागरिकांनी गाफील न राहता विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

मास्क लावा, सुरक्षित राहा

कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही प्रमाणात धोका कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह लस घेतलेल्या प्रत्येकाने नियमित मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित झालो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. लस ही सुरक्षित आहे. लसीकरणातील ४५ दिवस महत्त्वाचे आहेत, मात्र त्यानंतरही प्रत्येकाने त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाच्याच सहभागाची गरज आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ