शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘बाबूगिरी’ला जिल्हा परिषदेत लागणार लगाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:07 IST

कार्यालयातील लिपिक, प्रमुखांकडून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला जात नाही, पाठपुरावा केल्याशिवाय जनतेची, प्रशासकीय कामे वेळेवर होतच नाहीत,  अशीच प्रतिमा शासकीय कार्यालयांची झाली आहे. जिल्हा परिषदेत यापुढे हा प्रकार बंद करून ‘बाबूगिरी’ ला आळा घालण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती सुरू  केली जाणार आहे.

ठळक मुद्दे‘झिरो पेंडन्सी अँण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती सुरू होणार

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कार्यालयातील लिपिक, प्रमुखांकडून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला जात नाही, पाठपुरावा केल्याशिवाय जनतेची, प्रशासकीय कामे वेळेवर होतच नाहीत,  अशीच प्रतिमा शासकीय कार्यालयांची झाली आहे. जिल्हा परिषदेत यापुढे हा प्रकार बंद करून ‘बाबूगिरी’ ला आळा घालण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती सुरू  केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये  दोन मोहिमा राबवून प्रलंबित प्रकरणांचा आढावा, तसेच निपटारा करण्यात येत आहे.नागरिकांच्या व प्रशासकीय कामकाजास होणारा विलंब टाळण्यासाठी हे उपक्रम आहेत. त्यातून सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयातील अभिलेख आणि कक्षातील अभिलेखे अद्ययावत केले जाणार आहेत. त्यातील सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा करणे, विशिष्ट कालर्मयादेत प्रकरणे निकाली काढण्यासाठी ३ ऑक्टोबरपासून हा उपक्रम सुरू करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी दिले. 

दर सोमवारी प्रलंबित प्रकरणांचा आढावा पंचायत समिती स्तरावरून गटविकास अधिकार्‍यांनी सर्वच खातेप्रमुखांचा अहवाल गोळा करून तो मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर करावा लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दरमहा आढावा घेऊन त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत. 

उपमुकाअ कुळकर्णी पदावर असून नसल्यासारखेपहिल्या टप्प्यातील मोहिमेसंदर्भात जाणून घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याशी संपर्क केला असता, ते कधीच कार्यालयात भेटत नाहीत. मोबाइलवर कधी प्रतिसाद देत नाहीत. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांसोबत, पदाधिकार्‍यांसोबतही घडत आहे. त्यातून ते कुणालाही जुमानत नसल्याचे किस्सेही पुढे येत आहेत. कार्यालयीन कामकाजाबाबत पदावर असून नसल्यासारखेच ते वागत आहेत.