शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

शाैचालयांचे बांधकाम; सर्वेक्षणाला महापालिकांचा खाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. २०१५ मध्ये केंद्र शासनाने शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्यासाठी ...

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. २०१५ मध्ये केंद्र शासनाने शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शाैचास बसणाऱ्या नागरिकांचा शाेध घेऊन त्यांना वैयक्तिक शाैचालय बांधून देण्याचे महापालिकांना निर्देश जारी केले हाेते. शाैचालय बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून आठ हजार रुपये व राज्य शासनाकडून चार हजार रुपये यानुसार बारा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. या अनुदानात महापालिकास्तरावर तीन हजार रुपयांचा समावेश करून पात्र लाभार्थींच्या खात्यात १५ हजार रुपये जमा करण्यात आले. तत्पूर्वी घरी शाैचालय नसणाऱ्या नागरिकांचा शाेध घेण्यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवण्यात आली हाेती. शाैचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर शासनाने घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश दिले हाेते. यादरम्यान, केंद्र शासनाच्या चमूने स्वच्छ सर्वेक्षण-२०१८,१९ व २०२०ची प्रक्रिया पूर्ण केली असता शहरी भागात पुन्हा लाभार्थींचा शाेध घेऊन त्यांना शाैचालय बांधून देण्याची गरज असल्याचे समाेर आले. त्या अनुषंगाने सर्वेक्षण करून पात्र लाभार्थींचा शाेध घेणे अपेक्षित असताना मागील तीन महिन्यांपासून या प्रक्रियेकडे महापालिकांनी पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे.

केंद्राच्या निधीवर डल्ला

शाैचालयांचे बांधकाम करण्यापूर्वी जागेचे ‘जिओ टॅगिंग’करणे भाग असताना मनपातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संगनमत करून कंत्राटदारांनी कागदाेपत्री असंख्य शाैचालये उभारली. त्या बदल्यात केंद्र शासनाकडून प्राप्त काेट्यवधी रुपयांची देयके लाटण्यात आली. याप्रकरणाची शासनाने चाैकशी करण्याची गरज आहे.