शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पुलाच्या बांधकामामुळे शेत रस्ता झाला बंद; शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा मार्गावरील गौतमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे शेत रस्त्यावरील रपटा तुटल्याने शेतकऱ्यांना ...

तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा मार्गावरील गौतमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे शेत रस्त्यावरील रपटा तुटल्याने शेतकऱ्यांना या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले असून, रस्ता बंद झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास माहिती देऊन रस्त्याची दुरुस्ती करून रपटा बसविण्याची मागणी केली; मात्र याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

तळेगाव-पातुर्डा मार्गावरील गौतमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामादरम्याने गावातून शेताकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावरील रपटा फुटल्याने या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. या मार्गाने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास माहिती देऊन रपटा बसविण्याची मागणी केली; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती जैसे थे आहे. या मार्गाने नेहमीच वर्दळ असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनास विचारणा केली असता, ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करून रपटा बसविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

------------------------------

शेती करणे झाले कठीण

सद्य:स्थितीत खरीप हंगामाची पेरणी आटोपली असून, शेतीअंतर्गत मशागतीला वेग आला आहे. या मार्गाने गावातील जवळास १० शेतकऱ्यांची ४० ते ५० एकर शेती आहे. रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे कामे थांबली आहेत. शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

------------------