शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे!

By admin | Updated: September 6, 2016 02:30 IST

आयोग सुचविणार दुरुस्त्या; राजकीय पक्ष मात्र अस्वस्थ झाले आहेत.

अकोला, दि. ५: राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला. सदर आराखडा मंगळवारी निवडणूक आयोगाक डे सादर केला जाईल. त्यानुषंगाने पालिकेचे कर्मचारी सोमवारी मुंबईकडे रवाना झाले. मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचने तील फेरबदलाचा राजकीय पक्षांनी चांगलाच धसका घेतला असून, काही पक्षांत अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. यंदा महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार पार पडेल. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त चार नगरसेवकांचा एक याप्रमाणे प्रभाग तयार होतील. सर्व प्रभागांत चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा होईल. अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील, अशी रचना करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. प्राथमिक स्तरावर प्रभागाची पुनर्रचना करण्याचे काम महापालिकेने करायचे असून, आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सो पविली आहे. मनपाने तयार केलेल्या प्रभाग रचनेनुसार प्रभागांची संख्या २0 झाली असून, प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 नगरसेवकांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. प्रगणकांनी तयार केलेल्या गटातील लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जास्तीत जास्त २९ हजार ५४३ तर कमीत कमी २४ हजार लोकसंख्येचा निकष ठेवण्यात आला आहे. मनपाने तयार केलेला प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. त्यानुसार सोमवारी मनपाचे कर्मचारी आराखडा घेऊन मुंबईकडे रवाना झाले. निवडणूक आयोगाकडून या आराखड्यात बदल करून दुरुस्त्या सुचविल्या जाणार आहेत.