शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे!

By admin | Updated: September 6, 2016 02:30 IST

आयोग सुचविणार दुरुस्त्या; राजकीय पक्ष मात्र अस्वस्थ झाले आहेत.

अकोला, दि. ५: राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला. सदर आराखडा मंगळवारी निवडणूक आयोगाक डे सादर केला जाईल. त्यानुषंगाने पालिकेचे कर्मचारी सोमवारी मुंबईकडे रवाना झाले. मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचने तील फेरबदलाचा राजकीय पक्षांनी चांगलाच धसका घेतला असून, काही पक्षांत अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. यंदा महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार पार पडेल. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त चार नगरसेवकांचा एक याप्रमाणे प्रभाग तयार होतील. सर्व प्रभागांत चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा होईल. अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील, अशी रचना करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. प्राथमिक स्तरावर प्रभागाची पुनर्रचना करण्याचे काम महापालिकेने करायचे असून, आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सो पविली आहे. मनपाने तयार केलेल्या प्रभाग रचनेनुसार प्रभागांची संख्या २0 झाली असून, प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 नगरसेवकांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. प्रगणकांनी तयार केलेल्या गटातील लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जास्तीत जास्त २९ हजार ५४३ तर कमीत कमी २४ हजार लोकसंख्येचा निकष ठेवण्यात आला आहे. मनपाने तयार केलेला प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. त्यानुसार सोमवारी मनपाचे कर्मचारी आराखडा घेऊन मुंबईकडे रवाना झाले. निवडणूक आयोगाकडून या आराखड्यात बदल करून दुरुस्त्या सुचविल्या जाणार आहेत.