शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:38 IST

अकोला: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केले असून, अकोल्यातही २५० निवडक कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले.

अकोला: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केले असून, अकोल्यातही २५० निवडक कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. काँग्रेसचा इतिहास आणि सत्ताधाऱ्यांच्या फसव्या घोषणांची माहिती या प्रशिक्षणातून देण्यात आल्याची माहिती आमदार आणि राज्य कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमुख रामहरी रूपनवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन, महानगराध्यक्ष बबन चौधरी, सुनील धाबेकर, हिदायत पटेल, मदन भरगड, नातिकोद्दीन खतीब, डॉ. संतोष कोरपे व साजीद खान प्रामुख्याने उपस्थित होते.काँग्रेसचा जन्म आणि इतिहास उज्ज्वल आहे. त्या तुलनेत भाजपचा जन्म अलीकडचा आहे. काँग्रेसमध्ये नव्याने येणाºयांना शिस्त आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी राहुल गांधींच्या पुढाकारात हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सर्वत्र घेतले जात आहे. आतापर्यंत ५० जिल्ह्यांत अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले असून, त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार असल्याचा दावाही आमदार रूपनवर यांनी केला आहे. लीडरशीप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राज्यात चार प्रशिक्षक हे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणात काँग्रेसने ६० वर्षांत केलेला विकास आणि बदल सांगितला जात असून, भाजप-मोदी सरकारच्या पाच वर्षांतील फसव्या बाबींवरही बोट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. लवकरच दुसºया टप्प्यात ब्लॉकवाइज प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा सर्वधर्मसमभावाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची आहे. सर्वसामान्य लोकांना या बाबी पटवून सांगण्याचे कार्य हे कार्यकर्ते करतील, असेही ते म्हणाले. पुलवामा प्रकरणी काँग्रेस भाजपाप्रमाणे राजकारण करणार नाही. देशाची एकजूटता दर्शविण्याची ही वेळ असल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलले. लोकसभा निवडणूक संदर्भात विचारणा केली असता, समविचारी पक्षासोबत काँग्रेसची सकारात्मक बोलणी सुरू आहे. बोलणी अखेरच्या चरणात आहे, एवढेच सांगता येईल, असेही ते म्हणाले. त्यावेळी वामनराव थोटांगे, विजय शर्मा, दीपक बोरकर, कपिल रावदेव, अनंत बगाटे, तश्वर पटेल, संजय मेश्रामकर, डॉ. मोहन खरे, बबलू लोखंडे, आक्रोश सायखेडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.काँग्रेस कार्यकाळातील योजना नाव बदलून समोर आणल्या!काँग्रेस कार्यकाळातील विविध योजनांचे नाव बदलून भाजपने त्या समोर आणल्यात. आधार, जीएसटी, आवास आदी अनेक योजनांवर काँग्रेसचे कार्य सुरू होते. सामान्य माणसाला महागाई छळणार नाही, याचा विचार करून काँग्रेसने या योजना आणल्या होत्या; मात्र भाजप-मोदी सरकारने केवळ थापा दिल्या. पाच वर्षांतील त्यांचे आश्वासन त्यांनीच पाहावे म्हणजे समजेल. या सर्व बाबींचादेखील प्रशिक्षणात समावेश असल्याचे येथे सांगितले गेले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस