शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

‘लॉकडाऊन’मध्ये मोफत धान्य वितरणावर संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:35 IST

लॉकडाऊन’मध्ये मोफत धान्य वितरणाच्या मुद्यावर शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- संतोष येलकरअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात जाहीर करण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ आणि राज्यभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति महा प्रति सदस्य ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने ३१ मार्च रोजी घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींव्यतिरिक्त इतर शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य वितरणाचा निर्णय शासनामार्फत अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे मोफत धान्य वितरणाच्या मुद्यावरून राज्यातील शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत गरिबांची उपासमार होऊ नये तसेच कोणताही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींसाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत लाभार्थी कुटुंबातील प्रति सदस्य प्रति महा ५ किलो मोफत धान्य वितरित करण्याचा आदेश केंद्र शासनमार्फत राज्य शासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबातील प्रत् िसदस्य प्रति महा ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ३१ मार्च रोजी घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या अन्नधान्याव्यतिरिक्त तीन महिन्यांच्या कालावधीत प्रति सदस्य प्रति महा ५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात येणार असले तरी, राज्यातील एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी व इतर केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत तांदूळ वितरण करण्याचा निर्णय अद्याप शासनामार्फत घेण्यात आला नाही. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मध्ये मोफत धान्य वितरणाच्या मुद्यावर शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिधापत्रिका नसलेल्या गरिबांना धान्य मिळणार?‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर राज्यातील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीं कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रति महा ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला; मात्र ज्या गरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबांना मोफत धान्य वितरणाचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांना मोफत धान्य मिळणार की नाही, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला