शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

 सिंचन परिषदेतील निष्कर्ष; शिफारशी शासनाला पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:40 IST

राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. यातील अनेक शिफारशींपैकी लोकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी ग्राम पातळीवर मंडळ, समित्या स्थापन करू न लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे. आता प्रति घनमीटर पाण्याची उत्पादकता वाढविणे हे खरे काम आहे. तद्वतच पाणी व्यवस्थापन काळाची गरज आहे. पाण्याची वाढती गरज बघता भुपृष्ठावर जलसाठे वाढवावे लागणार आहेत. तद्वतच मूलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल. लोकांचे राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे. शेती, उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते, याचा ताळेबंद, हिशेब ठेवावा लागणार आहे.नद्या, ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा, घाण टाकणे टाळले पाहिजे, नद्यांच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे, त्यासाठीची जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी शहर ते ग्रामपातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या, या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमार्फत होणे गरजेचे आहे. व्यापक स्वरू पात जनजागृती होईल. सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही यानुषंगाने काम होत आहे; परंतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची. ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे. आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू शकलो. यासह आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे. शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना गती मिळाली. पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे काळाजी गरज आहे, कालव्याद्वारे होणाºया सिंचनामध्ये वहन व्यय कमीत कमी व्हावे, त्याकरिता आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन व्हावे, त्याकरिता कमी पाण्यामध्ये येणाºया पीक पद्धतीचा स्वीकार करणे तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.खारपाणपट्टा हा विदर्भाला शाप म्हणतात; परंतु ही निसर्गाची देणगी असून, येथे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास खारपाणपट्ट्याचा हा भूभाग सुजलाम् सुफलाम् होईल. ‘सिंचनासाठी नलिका वितरण प्रणालीत’ (पीडीएन) दोष असल्याने या पद्धतीद्वारे पाणी सोडल्यास शेवटच्या शेतकºयापर्यंत पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे या प्रणालीतील दोष दूर करावा, लागणार आहे. यावर निष्कर्ष काढण्यात आले असून, या अंमलबजावणीसाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.

 सिंचन परिषदेत पाण्याविषयी दोन दिवस मंथन होऊन महत्त्वाचे निष्कर्ष काढण्यात आले. अभ्यासपूर्ण निर्णय झाले. निष्कर्षाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.- डॉ. माधवराव चितळे,आंतरराष्टÑीय जलतज्ज्ञ,पुणे

 

टॅग्स :Akolaअकोला