शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

 सिंचन परिषदेतील निष्कर्ष; शिफारशी शासनाला पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:40 IST

राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. यातील अनेक शिफारशींपैकी लोकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी ग्राम पातळीवर मंडळ, समित्या स्थापन करू न लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे. आता प्रति घनमीटर पाण्याची उत्पादकता वाढविणे हे खरे काम आहे. तद्वतच पाणी व्यवस्थापन काळाची गरज आहे. पाण्याची वाढती गरज बघता भुपृष्ठावर जलसाठे वाढवावे लागणार आहेत. तद्वतच मूलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल. लोकांचे राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे. शेती, उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते, याचा ताळेबंद, हिशेब ठेवावा लागणार आहे.नद्या, ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा, घाण टाकणे टाळले पाहिजे, नद्यांच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे, त्यासाठीची जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी शहर ते ग्रामपातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या, या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमार्फत होणे गरजेचे आहे. व्यापक स्वरू पात जनजागृती होईल. सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही यानुषंगाने काम होत आहे; परंतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची. ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे. आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू शकलो. यासह आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे. शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना गती मिळाली. पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे काळाजी गरज आहे, कालव्याद्वारे होणाºया सिंचनामध्ये वहन व्यय कमीत कमी व्हावे, त्याकरिता आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन व्हावे, त्याकरिता कमी पाण्यामध्ये येणाºया पीक पद्धतीचा स्वीकार करणे तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.खारपाणपट्टा हा विदर्भाला शाप म्हणतात; परंतु ही निसर्गाची देणगी असून, येथे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास खारपाणपट्ट्याचा हा भूभाग सुजलाम् सुफलाम् होईल. ‘सिंचनासाठी नलिका वितरण प्रणालीत’ (पीडीएन) दोष असल्याने या पद्धतीद्वारे पाणी सोडल्यास शेवटच्या शेतकºयापर्यंत पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे या प्रणालीतील दोष दूर करावा, लागणार आहे. यावर निष्कर्ष काढण्यात आले असून, या अंमलबजावणीसाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.

 सिंचन परिषदेत पाण्याविषयी दोन दिवस मंथन होऊन महत्त्वाचे निष्कर्ष काढण्यात आले. अभ्यासपूर्ण निर्णय झाले. निष्कर्षाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.- डॉ. माधवराव चितळे,आंतरराष्टÑीय जलतज्ज्ञ,पुणे

 

टॅग्स :Akolaअकोला